AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतोय ते. त्यानंतर मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते असा घणाघात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

CM Uddhav Thackeray : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 08, 2022 | 9:28 PM
Share

औरंगाबाद : राज्यात मशिदीवर असलेल्या भोंग्यावरून (Bhonge)होणाऱ्या आजानचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी राण उठवून दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी यामुद्द्यावरू शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच जर दिवसाही आजान ही आवाजाच्या मर्यादेपेक्षा वाजली तर मग हनुमान चालिसा लावू असे म्हटलं होतं. त्यानंतर खासदार नवनित राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान करत त्यांच्या घरासमोर जाऊन भोंग्यावरून हनुमान चालिसा म्हणू असा इशारा दिला होता. तर औरंगाबमध्ये ओवैसी संधू येऊन औरंगजेबच्या कबरीवर डोकं ठेवून गेले होते. त्यावरूनही राजकारण झाले होते. तेंव्हा प्रशासनाने कबरीवर सुरक्षा पुरवली होती. त्यावरूनही ठाकरेंवर निशाणा साधला होता. यासर्वांवर आता मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सडेतोड उत्तर देताना भाजपवर आज निशाणा साधला आहे. तसेच AIMIM ला आणि भोंगे वाजवणाऱ्यांना कोण सुपाऱ्या दिल्या असा सवाल केला आहे.

मध्यंतरी राज्यात भोंग्यावरून आणि हनुमान चालिसावरून ठाकरे सरकारला घेरण्यात आले होते. तसेच औरंगजेबच्या कबरीवरूनही टार्गेट केले गेले होते. तर हेच का तुमचे हिंदित्व का असा खोचक सवाल करण्यात आला होता. हा सवाल मनसे तसेच भाजपकडून वेळोवेळो केला जात होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार आणि कडक शब्दात उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी हे सर्व करणाऱ्यांना कोण सुपाऱ्या दिल्या असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींना हे माहित नाही का

तसेच आपल्या देशात विरोधी पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्याच मुद्द्यावर बोलतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे सांगितलं. तसेच ते म्हणाले की, हो पंतप्रधान हे बरोबर सांगत आहेत. पण त्यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतोय ते. त्यानंतर मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते असा घणाघात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तसेच बाबरीवरून भाजपला सुनावताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाबरीच्या जागेवर मंदिर बांधायचं धाडस तुम्ही केलं नाही. कोर्टातून आदेश आल्यानंतर तुम्ही जनतेसमोर झोळ्या पसरवल्या. मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे जे बेलगामपणे सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्यावर लगाम घालावा. तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर आमचाही संयम सुटेल. तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. हा भगवा फडकवायला बरा म्हणून घेतलेला नाही. हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा, हिंतुत्वाचा भगवा आहे. इकडे हनुमान चालिसा बोलायची आणि तिकडे जाऊन शिव्या द्यायच्या हे बरोबर नाही.

मित्र हा हाडवैरी बनला

तसेच भाजपच्या सरकार पडणार यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. पुन्हा येणार म्हणत होते. त्यांना कळलंही नाही की या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे कधी पुर्ण झाली. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली. मात्र मित्र हा हाडवैरी बनल्याचा त्यांनी सांगितले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...