AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद, CM फडणवीस संतापले, शिवसेनेच्या नेत्यांना सुनावलं

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राजकारण सुरू झाले आहे. अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद, CM फडणवीस संतापले, शिवसेनेच्या नेत्यांना सुनावलं
CM Fadnavis and PawarImage Credit source: Google
| Updated on: Feb 06, 2026 | 3:39 PM
Share

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अर्थ खाते वगळता अजित पवार यांच्याकडे असलेली इतर खाती देण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद होते, तेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र यानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर या शपथविधीवरून टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

शिवसेना नेत्यांकडून शपथविधीवरून राजकारण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले की, सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केलं त्यांना संपवण्याचे यांनी काम केले आहे. दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी लाजीरवाणे काम सुरू केले. दादांची राख सुद्दा विजली नाही, शांत होऊ दिली नाही, यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली आहे. 10 दिवस गेले आसते तर काय झाले असते. तटकरे किती चाणाक्ष आणि चालू आहे पहा. शरद पवार हे पक्षाचा ताबा घेतील म्हणून ज्या वहिनीचे कुंकू पुसले, मंगळसुत्र तोडले गेले त्यांना मुंबईत आणले. आपण हिंदु लोक सुतक पाळतो पण इथं काही नाही हे निंदाजनक आहे, क्लेषदायक आहे. ही आपली संस्कृती नाही, सुनील तटकरेंना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही.’ तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी हा शपथविधी इतक्या लवकर कुणी करायला लावला? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच संजय शिरसाट यांनीही अजित पवार यांच्या निधनानंतर खुप लवकर शपथविधी झाल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

शिवसेना नेत्यांच्या या विधानावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जो काही वाद होत आहे तो निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ आपलं राजकारण कसं पाहता येईल हा प्रयत्न करत आहे हे अतिशय चुकीच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व व मोठे नेते अजित दादा दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या माध्यमातून जे काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे.

Follow Us
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर