AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam: नाच्या… रामदास कदमांची जहरी टीका, भास्कर जाधवांसह सुनील तटकरेंवर मोठा आरोप काय?

Ramdas Kadam on Sunil Tatkare and Bhaskar Jadhav: कोकणातील तीन बड्या नेत्यांमधील राजकीय शिमगा पुन्हा एकदा दिसला. रामदास कदम यांनी काल सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर भास्कर जाधवांनी भाईंवर मोठे आरोप केले. आता कदमांनी तटकरेंसह भास्कर पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

Ramdas Kadam: नाच्या... रामदास कदमांची जहरी टीका, भास्कर जाधवांसह सुनील तटकरेंवर मोठा आरोप काय?
रामदास कदमImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 1:58 PM
Share

Ramdas Kadam on Sunil Tatkare and Bhaskar Jadhav: कोकणातील तीन बड्या नेत्यांमध्ये राजकीय शिमगा रंगला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर काल रामदास कदम यांनी तोंडसूख घेतले. उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांनी रामदास भाईंवर टीका केली. आज रामदास कदम यांनी तटकरे यांच्यासह भास्कर पाटलांवर तुफान हल्लाबोल केला. त्यांनी दोघांवर घणाघाती आरोप केला. त्यामुळे कोकणात पुन्हा राजकीय वादंग पेटले आहे.

तटकरे यांना निवडून आणले

यावेळी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. तर तटकरे यांना आपण निवडून आणल्याचा दावा केला. तटकरे यांना आपल्यामुळे निवडणुकीचे तिकीट मिळाले. निवडून आल्यावर ते बेईमान झाल्याचा आरोप त्यांनी केला. भास्कर जाधव आणि तटकरे यांच्यामध्ये काही फरक नाही असा आरोपही रामदास कदम यांनी केला. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

भास्कर जाधवांवर जहरी टीका

भास्कर जाधव ज्या ताटात खातात, तिथंच छेद करतात. ते नाच्या आहेत. ते शिमग्यात गोमू सारखे नाचतात. भास्कर जाधव यांचा मुलगा लोटे एमआयडीसीत दमदाटी करतो. तरुणांच्या जीवावर ते निवडून आले आणि ठेके मुलाला आणि जावायला देतात. भास्कर जाधव कसले निष्ठावंत, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवार यांच्याकडे गेले. बाळासाहेब म्हणायचे बाडगा अधिक कडवा असतो हे बाडगा आहे. हे स्वतः भगताकडे जातात आणि आम्हाला बदनाम करतात. जिल्हा परिषद निकाल लागेल त्यावेळी जाधवांचाही निकाल लागलेला असेल अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली.

सुनील तटकरे हे विश्वासघातक

सुनिल तटकरे विश्वासघातकी आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केलं त्यांना संपवण्याचे यांनी काम केले आहे. ज्या अंतुले यांनी त्यांना मोठं केलं, त्यांना संपवण्याचे काम तटकरेंनी केले. दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी लाजीरवाणे काम सुरू केले. दादांची राख सुद्दा विजली नाही, शांत होऊ दिली नाही, यांनी सुनेत्रा वहिणींनी शपथ घ्यायला लावली आहे. 10 दिवस गेले आसते तर काय झाले आसते. तटकरे किती चाणाक्ष आणि चालु आहे पाहा. शरद पवार हे पक्षाचा ताबा घेतील म्हणून ज्या वहिणीचे कुंकू पुसले, मंगळसुत्र तोडले गेले त्यांना मुंबईत आणले. आपण हिंदु लोक सुतक पाळतो पण इथं काही नाही हे निंदाजनक आहे, क्लेषदायक आहे. ही आपली संस्कृती नाही, सुनील तटकरेंना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही, अशी घाणाघाती टीका त्यांनी केली.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.