AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा, वाचा…

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा, वाचा...
Social Equality and Harmony yearImage Credit source: X
| Updated on: Mar 06, 2026 | 3:21 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याच्या जनतेसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी सरकारकडून निधीही दिला जाणार आहे. सामाजिक समता व समरसता वर्ष नेमकं काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2026-27 – सामाजिक समता व समरसता वर्ष

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे केले जाणार आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. संपूर्ण राज्यात या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

विविध विकासकामे केली जाणार

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळे महाड येथील पायाभूत सोयीसुविधांसाठी विकास आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व समाधी यांना जोडणाऱ्या तीर्थश्रेत्र सर्किटचा विकास केला जाणार आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्राम समृ्द्धी अभियान सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर एआयच्या मदतीने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम उन्नत योजना सुरू केली जाणार आहे अशी घोषणाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त दादर मुंबई येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे.

वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 2026-27 हे वर्ष “सामाजिक समता व समरसता वर्ष” म्हणून घोषित केले आहे. याचा उद्देश समाजात समानता, प्रेम आणि सुसंवाद वाढवणे हो आहे. या संपूर्ण वर्षात वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे जात, लिंग आणि धर्मावर आधारित भेदभाव नष्ट करण्याचे काम केले जाणार आहे.

Follow Us
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!