मविआ सरकार जे बोलतं ते करून दाखवणारं सरकार : Uddhav Thackeray

मविआ सरकार जे बोलतं ते करून दाखवणारं सरकार : Uddhav Thackeray

| Edited By: Pradeep Garad | Updated on: Mar 24, 2022 | 5:59 PM

मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा (Ministers) कुणी केला नव्हता. मुंबईचा (Mumbai) विचार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा (Ministers) कुणी केला नव्हता. मुंबईचा (Mumbai) विचार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. काही योजना करायच्या आहेत पण आपल्या हातात नाही. धारावी पुनर्विकास करण्याचे मनात आहे. धारावीचा विकास व्हायला पाहिजे, केद्रासोबत आमचे बोलणे सुरू आहे. रेल्वेच्या जागा हस्तांतरणासंदर्भात बोलणी सुरू आहे. रेल्वेच्या जागा अजून हस्तांतरित होत नाहीत. आमदारांना आपण घर देणार आहोत, आघाडी सरकार काम करून दाखवते, फक्त घोषणा करत नाही, आम्ही दिलेला शब्द पाळतो, केंद्राच्या जागेचा वादही सोडवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सफाई कामगारांसंबंधीही विचार आम्ही केलेला आहे. ग्रामीण आणि कष्टकरी लोकांना घरे देणार असल्याचे ते म्हणाले.

 

Published on: Mar 24, 2022 5:56 PM
Follow Us