उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?

लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 12:20 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते राज्यातील नागरिकांना संबोधित करतील. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी लॉकडाऊन पूर्णपणे शिथील न केल्यामुळे दैनंदिन व्यवहारांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. तर मुंबईसारख्या शहरात जनतेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

याशिवाय, गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी मराठा संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा संघटनांच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांचे समाधान झाले असले तरी समाजाच्या इतर स्तरांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सगळ्यावर काही निर्णायक भाष्य करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेकडून लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरे कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, मुख्यमंत्री काय बोलणार?

सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Watch LIVE: Facebook: https://bit.ly/2TZbpTX Twitter: https://bit.ly/30RheWt YouTube: https://bit.ly/33JEnMA Instagram: https://bit.ly/3iVaE7T

संबंधित बातम्या:

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

(CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.