AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते पण..’; त्या टीकेवरून चव्हाणांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

'फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते पण..'; त्या टीकेवरून चव्हाणांचा खोचक टोला
| Updated on: Nov 16, 2024 | 3:44 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियल नसून ते इंटरनॅशनल मटेरियल आहे, विकास कामांच्या फाईलवर सही करताना आमच्या हाताला लकवा मारत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे, काँग्रेसकडून फडणवीसांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे, तसेच त्यांनी याबद्दल माफी मागवी अशी मागणी देखील होतं आहे. दरम्यान आता यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले चव्हाण? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियल नसून ते इंटरनॅशनल मटेरियल आहे, असं म्हटलं होतं, आता या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते, पण हा माझा गैरसमज होता. त्याच बरोबर मी आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकारणी असल्याचं सांगत मी काही सडकछाप राजकारणी नाही हे त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं आहे,  त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असं खोचक उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की काहीही झालं तरी मी माझा सुसंस्कृतपणा सोडणार नाही. ते कराडच्या शेरे येथे झालेल्या सभेत बोलत होते.

राजकारण तापलं

दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी चव्हाणांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. फडणवीस यांनी माफी मागवी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.