AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे… लवकरच मोठा ट्विस्ट!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत माजी मंत्री बच्चू कडू आणि शिंदे यांच्यात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोठी बातमी! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे... लवकरच मोठा ट्विस्ट!
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2026 | 4:37 PM
Share

Bacchu Kadu : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 12 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनादेखील राजकीय सोईचा आणि भविष्यकालीन राजकारणात फायदेशीर ठरणारा चेहरा शोधत आहे. दरम्यान, एकीकडे या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच आता दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे थेट बच्चू कडू यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांच्याकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. परंतु अगोदर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच याबाबत निर्णय घेणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बच्चू कडू आमदारकी स्वीकारणार का?

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू वेगवेगल्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळे सरकार जेरीस आले होते. सरकारने बच्चू कडू आणि शिष्टमंडळाला बोलवून कर्जमाफीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर सरकारने जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केली होती. या आंदोलनादरम्यान त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली होती. तसेच भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर भावाच्या हत्येचा कट रचल्याचाही नुकताच आरोप केला आहे. या आरोपामुळेही बच्चू कडू राज्यात चर्चेत आले होते.

बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार?

दरम्यान, शेतकरी कर्माफीसाठी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करणारे बच्चू कडू सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दिलेल्या विधानपरिषदेच्या ऑफरला स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत