हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर, इशारा देणाऱ्या यंत्रणेसाठी नागरिकांची ऑनलाईन मोहीम

हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट, अतिवाईट स्तरावर असणाऱ्या दिवसांमध्ये (बॅड एअर डेज) स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांसाठी आरोग्याबाबत इशारा देण्याची यंत्रणा सार्वजनिक स्तरावर सुरू करावी, अशी मागणी राज्यातील विविध नागरी संघटनांनी केलीय. हवेची गुणवत्ता बिघडलेल्या दिवसांमध्ये योग्यवेळी इशारा मिळू शकला, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या संवदेनशील समूहांसाठी ते मदतीचं ठरेल, असा उद्देश या मागणीमागे आहे.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर, इशारा देणाऱ्या यंत्रणेसाठी नागरिकांची ऑनलाईन मोहीम
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:52 PM

मुंबई : हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट, अतिवाईट स्तरावर असणाऱ्या दिवसांमध्ये (बॅड एअर डेज) स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांसाठी आरोग्याबाबत इशारा देण्याची यंत्रणा सार्वजनिक स्तरावर सुरू करावी, अशी मागणी राज्यातील विविध नागरी संघटनांनी केलीय. हवेची गुणवत्ता बिघडलेल्या दिवसांमध्ये योग्यवेळी इशारा मिळू शकला, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या संवदेनशील समूहांसाठी ते मदतीचं ठरेल, असा उद्देश या मागणीमागे आहे. याबाबत कृती करण्यासाठी हवेची गुणवत्ता खराब असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर अशा हवेची पुरेशी गुणवत्ता न गाठलेली शहरातील (नॉन अटेन्मेंट शहरं) नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. हवेच्या गुणवत्तेबाबतची माहिती फक्त हिवाळ्यातच नव्हे तर एरवीसुद्धा द्यावी, अशीही मागणी याद्वारे केली जात आहे.

कोणत्याही ठिकाणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांकाचा स्तर वाईट, अति वाईट किंवा तीव्र प्रदूषण असा असतो. हा स्तर सुरक्षित मर्यादेच्या पलिकडे जातो त्या दिवसांना ‘बॅड एअर डेज-वाईट हवेचे दिवस’ म्हणतात. हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा हवेतील प्रदूषणाचे प्रमाण दाखवतो. म्हणूनच याबाबत 7 सप्टेंबर, ‘द इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज’ या दिवशी ही ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा दिवस साजरा केल्या जाण्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 2021 साठी ‘स्वच्छ हवा, आरोग्यदायी वसुंधरा – हेल्दी एअर, हेल्दी प्लॅनेट’ ही संकल्पना आहे. कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विशेषत: हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेत या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.

देशातील 132 शहरांचा आणि महाराष्ट्रातील 19 शहरांचा सहभाग

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत (एनसीएपी) महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश (नॉन अटेन्मेट) होतो. देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा ही संख्या अधिक आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या हवा गुणवत्ता निकषांची पूर्तता न होणारी शहरे ही नॉन अटेन्मेंट शहरे म्हणून ओळखली जातात.

“हवेची गुणवत्ता बिघडते तेव्हा स्वतःसोबत प्रियजनांचीही काळजी घेता यावी”

मुंबईतील ‘वातावरण फाऊंडेशन’चे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र क्लीन एअर कलेक्टीव्ह’ सदस्य भगवान केसभट म्हणाले, “हे देशव्यापी असे नागरिकांच्या पुढाकारातून सुरू असलेले अभियान आहे. सातत्याने आरोग्यविषयक सल्ला देणारी यंत्रणा सार्वजनिक स्तरावरील माध्यमांद्वारे सुरू करावी अशी या ऑनलाईन पिटिशनमधील नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून हवेची गुणवत्ता बिघडते तेव्हा केवळ स्वत:चीच नाही तर आपल्या प्रियजनांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेता येईल. हवेची पुरेशी गुणवत्ता न गाठलेल्या राज्यातील सर्व 18 शहरांमध्ये (नॉन अटन्मेट सिटीज) स्वच्छ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी या मोहिमेतील सहभागींची मागणी आहे.”

“हवेची गुणवत्ता वाईट असण्याच्या काळात आरोग्य सल्ला जारी करा”

“या शहरांमध्ये स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत नमूद केल्यानुसार ठरलेल्या वेळेमध्ये कोणती कृती करणे गरजेचे आहे याची सरकारला जाणीव हवी असे राज्यातील नागरिकांच्या गटांचे म्हणणे आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून हवेची पर्याप्त गुणवत्ता न गाठलेल्या राज्यातील सर्व शहरांचे (नॉन अटेन्मेट सिटिज) नागरिक महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली जाईल. तसेच हवेची गुणवत्ता वाईट असण्याच्या काळात आरोग्य सल्ला जारी करावा, अशी मागणी करणारे पत्र देतील,” असे केसभट यांनी सांगितले.

राज्यभरातील जवळपास 15 संस्थांचा मोहिमेला सक्रिय पाठिंबा

याबाबतची ऑनलाइन पिटीशन समाजमाध्यमे आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करण्यात आले आहे. राज्यभरातील जवळपास 15 संस्थांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला आहे. राज्यातील ज्या नागरिक संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्या याबाबत जागृती निर्माण करत आहेत.

कोळसाधारित ऊर्जा प्रकल्पांच्या परिसरात शहरांमध्ये उन्हाळा-हिवाळा हवा खराब

नागपूरमधील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या (सीएफएसडी) प्रमुख लीना बुद्धे म्हणाल्या, “कोळसाधारित ऊर्जा प्रकल्पांच्या परिसरात शहर असल्यामुळे उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतुंमध्ये हवेची गुणवत्ता खराब होते हे दिसून येते. परंतु, हवेच्या गुणवत्ता निर्देशांक स्तराबाबत किंवा दिवसभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या तासांमध्ये आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात. याबाबत बहुतांश नागरिक अनभिज्ञ असतात. सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या काळात, त्या त्या भागातील नागरिकांना विशेषत: सकाळी चालणे, धावणे, सायकलिंग यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना असा आरोग्यविषयक सल्ला हितकारी ठरू शकेल.”

प्रदुषणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचं जीवनमान 4 वर्षांनी घटलं

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने (इपीआयसी) अलिकडेच 2019 मध्ये ‘एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स – हवेचा गुणवत्ता जीवनमान निर्देशांक’ जाहीर केला आहे. त्यानुसार पीएम 2.5 मुळे नागरिकांच्या वयोमानात राष्ट्रीय स्तरावर सरासरी घट झाली आहे. महाराष्ट्रातील हे प्रमाण 4 वर्षे आहे. शहरनिहाय पीएम 2.5 च्या धोक्यानुसार पाहिल्यास पुण्यात 4.2 वर्षे, मुंबईत 3.7 वर्षे तर विदर्भातील अनेक प्रदूषित जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांनी लोकांचे आयुष्यमान कमी झाल्याचे आढळून आले.

“हवेची गुणवत्ता केवळ मोजून चालणार नाही”

दरम्यान, चंद्रपूरमधील ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. योगेश दूधपाचरे म्हणाले की, चंद्रपूर हे नेहमीच महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक शहर आहे. त्यासाठी स्थानिक महानगरपालिकेकडे हवा गुणवत्ता संनियंत्रणे (मॉनिटरिंग स्टेशन) अधिक प्रमाणात हवी. “हवेची गुणवत्ता केवळ मोजून चालणार नाही. लोकांना त्याबाबत सहज समजेल अशा ग्राफिक्सद्वारे आणि सहज दिसेल अशा माध्यमातून शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी सतत दाखवावे लागेल. हवेची गुणवत्ता अतिशय वाईट असेल तेव्हा त्याबाबत लोकांना सूचना, इशारा देणारी यंत्रणा महानगरपालिकेकडेही असायला हवी, असे त्यांनी सांगितले.

आरोग्याबाबत लोकांना धोक्याचा इशारा द्यायला हवा

सर्वसामान्यांना समजावे, जाणीव निर्माण व्हावी म्हणून हवेचा गुणवत्ता निर्देशाक तयार करण्यात आल्याचे सांगत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अतिरिक्त संचालक दिपांकर साहा म्हणाले, “एखाद्या प्रदेशातील हवा गुणवत्ता निर्देशांक सुरक्षित मर्यादा पार करून गेल्यावर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्याबाबत लोकांना धोक्याचा इशारा द्यायला हवा. जेणेकरून वाईट हवेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून नागरिक आपला बचाव करू शकतील. ही तरतूद सर्वांसाठीच अनिवार्य असली पाहिजे. म्हणूनच राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याचा (एनसीएपी) भर हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे हे योग्यच आहे.”

प्रदूषित हवेचा परिणाम मेंदू आणि प्रजननावरही

हवेच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम फक्त श्वसन अवयवांवरच होतात असे नाही तर मेंदू तसेच अगदी प्रजननाशी संबंधित अवयवांवरदेखील होतात असे अनेक अभ्यास अहवालांनी यापूर्वीच दाखवून दिले आहे. देशभरातील चार इन्स्टिट्यूट्सच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच एक देशव्यापी अभ्यास सर्वेक्षण केले असून त्याचा हवा प्रदूषणाशी थेट संबंध होता. खराब हवा गुणवत्ता असलेल्या आणि पीएम 2.5 चे उत्सर्जन अधिक असणाऱ्या परिसरातील लोकांना कोविड-19 चा संसर्ग आणि त्या संबंधित मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे हा अहवाल सांगतो.

वाईट हवेच्या दिवसांत योग्य काळजीची माहिती द्यावी

नागरिकांच्या मोहिमांसाठी तयार करण्यात आलेले पोर्टल झटका डॉट ऑर्गच्या कॅम्पेन्स डायरेक्टर दिव्या नारायणन म्हणाल्या की जागतिक महामारीत विषाणूपासून आपले व आपल्या प्रियजनांचे रक्षण व्हावे यासाठी प्रत्येकाला जास्तीत जास्त माहिती हवी असून ती प्रत्येकजण शोधत असतो. “त्याचप्रमाणे आपण ज्या हवेत श्वास घेतो त्याची आणि त्या हवेचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात याची भरपूर आणि इत्थंभूत माहिती उपलब्ध व्हावी अशी मागणी आपण केली पाहिजे हे समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पाहता, आपल्याला हवेच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणात निश्चित स्वरूपाची माहिती मिळाली तर वाईट हवेच्या दिवसांत आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबाबत आपल्याला विविध पर्याय माहिती होतील.”

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका खूपच महत्त्वाची

आयआयटी कानपूरच्या सिव्हील इंजीनियअरिंग विभागाचे प्राध्यापक एस. एन. त्रिपाठी म्हणाले, “हवेची पर्याप्त गुणवत्ता गाठू न शकलेल्या शहरांमधील (नॉन अटेन्मेंट सिटीज) शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. हवा प्रदूषण नोंदविणाऱ्या यंत्रणेचे जाळे वाढवून विस्तारीत करणे, माहितीसाठा विकसित करणे आणि त्याबाबत सर्वांना माहिती देणारी यंत्रणा विकसित करणे (वेबसाईट, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि रेडिओ) यास चालना मिळते. तसेच स्थानिक संस्थांना शहराचे व्यवस्थापन नीट करता येऊ शकेल (अधिक चांगली वाहतूक व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन).”

“शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी 15 वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यानुसार प्राप्त निधीचे वाटप या संरचनेनुसार विभागून द्यायचे आहे. आणि म्हणून हवेच्या गुणवत्तेची विविध पातळ्यांनुसार विभागणी करून त्याच्याशी संबंधित आरोग्यविषयक सूचना, सल्ला, इशारे नागरिकांना दररोज देण्याची यंत्रणा तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज्’ काय आहे?

आंतरराष्ट्रीय समूदायामध्ये शुद्ध हवेबाबत जागरूकता आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे या दृष्टीने, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 7 सप्टेंबर हा दिवस हा ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज्’ म्हणून जाहीर केला. यासाठी ‘सर्वांसाठी शुद्ध हवा’ ही पहिल्या वर्षाची संकल्पना होती. यावर्षीच्या इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज्चा विषय ‘आरोग्यदायी हवा, आरोग्यदायी वसुंधरा – हेल्दी एअर हेल्दी प्लॅनेट’ असा ठरविला आहे.

आरोग्यदायी हवा असलेले पर्यावरण याला अव्वल प्राधान्य

खासकरून कोविड-19 महामारीच्या काळात हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम त्यातून अधोरेखित करता येतील. आरोग्यदायी हवा असलेले पर्यावरण याला अव्वल प्राधान्य आहेच, परंतु त्याचबरोबर हवामान बदल, मानव आणि वसुंधरेचे आरोग्य, शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांचाही समावेश आहे. शुद्ध व स्वच्छ हवा आपल्या सर्वांना मिळाली पाहिजे हा आपला हक्क आहे आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्न आपण केले पाहिजेत याची ठसठशीत जाणीव व्हावी यासाठी 7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज् ठरविण्यात आला आहे.

हेही वाचा :

नाशिकमध्ये मनपा आणि मूर्तीकारांचा पुढाकार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘माझा बाप्पा’ उपक्रम

आनंदाची बातमी! पाच वर्षांमध्ये पुण्यातील झाडांची संख्या 8.5 लाखांनी वाढली

VIDEO: नाशिकमध्ये फांदी तोडण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, 18 बगळ्यांसह पिलांचा मृत्यू, ठेकेदाराला नोटीस

व्हिडीओ पाहा :

Demand of Pollution indicator in 19 cities of Maharashtra on International day of clear air for blue skies

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.