AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख कुटुंबाच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

संतोष देशमुख कुटुंबाच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Dec 23, 2024 | 6:52 PM
Share

काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान आज शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी मिळून हत्या केली त्यातील ज्यांना अजूनही अटक झालेली नाहीये, त्यांच्या अटकेची कारवाई तातडीनं केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले सामंत? 

संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी मिळून हत्या केली त्यातील ज्यांना अजूनही अटक झालेली नाहीये, त्यांच्या अटकेची कारवाई तातडीनं केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे, देशमुख कुटुंबाला मदत घेऊन शिंदे साहेबांनी पाठवलं होतं, ती मदत कुटुंबाला केली आहे. स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ते शिंदे साहेब सहकार्य करतील, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ज्या कोणाचा यामध्ये हात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळून देऊ. पोलीस अधीक्षक यांनी नव्याने चार्ज घेतल्यानंतर त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही आहोत, तातडीने जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलं जाईल.. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आयजीच्या नेतृत्वाखाली एस आय टी नेमलेली आहे. न्यायालयीन चौकशी देखील होणार आहे, त्यामध्ये जे दोषी असतील त्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.