AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही, म्हणूनच चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागतात: devendra fadnavis

राज्यातील आघाडी सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही. त्यामुळेच आपल्याला असे चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागत आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही, म्हणूनच चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागतात: devendra fadnavis
सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही, म्हणूनच चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागतात: devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Reporter Rahul Zori
Reporter Rahul Zori | Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 6:56 PM
Share

मुंबई: राज्यातील आघाडी सरकार (mahavikas aghadi) चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही. त्यामुळेच आपल्याला असे चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागत आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मी मुंबई अभियान आणि शिव कल्याण केंद्राच्यावतीने मोबाईल दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते या मोबाईल दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. चालता फिरता दवाखाना सुरू होत आहे. दक्षिण मध्य मुंबईत या व्हॅन रोज जाणार आहेत. या व्हॅनमध्ये प्रशिक्षित डॉक्टर असतील. लोकांच्या दारापर्यत हे काम होणार आहे. रुग्ण सेवेचे महत्त्व आपण पाहिलेच आहे. कोविड काळात मुंबईत (mumbai) एकाच बेडवर पेंशट आणि रुग्ण आपण पाहिले. त्यामुळेच मोबाईल दवाखाने उपयोगी ठरणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

आरोग्य सेवेचा खर्च वाढत आहे. त्यामुळे हा खर्च लोकांना परवडत नाहीये. अधिवेशनात आम्ही सरकार आणि पालिका दवाखान्याची परिस्थिती पाहिली. पालिका मागील वर्षात एकही औषध विकत घेऊ शकले नाही. जेजेमध्ये देखील पॅरासिटीमॉल बाहेरून घ्यावी लागत आहे. त्यामुळे सामान्य माणसाची परवड होत आहे. रुग्ण सेवेवर खर्च करण्यापेक्षा चौक सुशोभीकरणावर खर्च करून मलिदा कसा खाता येईल हे सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गरीबांना कोणताही फायदा नाही

महात्मा फुले जनआरोग्य योजना देखील वापरण्यात आली नाही. गरिबांना कोणताही फायदा या सरकारच्या काळात झाला आहे. राज्य सरकारची परिस्थिती असताना केंद्राच्या सर्व योजना पोहोचत आहेत. गरिबांना कोणताही फायदा या सरकारच्या काळात झाला नाही. राज्य सरकारची परिस्थिती असताना केंद्राच्या सर्व योजना पोहोचत आहेत. भाजपने गावागावात प्रसिद्ध आरोग्य दूत तयार करण्याचे काम केले आहे, असंही त्यांनी सांगितलं. मन की बातमध्ये मोदींनी जी प्रेरणा देणारी वक्तव्य केली त्यातून प्रसाद लाड यांनी प्रेरणा घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

राज्य बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व, भाजपला धोबीपछाड

Maharashtra News Live Update : देशातल्या धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही, शरद पवार कडाडले

UPA च्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्वाचा ठराव

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?