.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

ज्यांच्याकडे घरात खायला काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन
| Updated on: Oct 21, 2020 | 10:44 AM
Share

हिंगोली: अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना बँकांकडून शेतकऱ्यांना रोज फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्यांच्याकडे घरात खायला काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यावर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही बाब निदर्शनास आणून दिली. बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी तगादा लावला जात आहे. दिवसातून तीन चार वेळी शेतकऱ्यांना फोन केला जात आहे. अधिकारीही घरी येऊन कर्जासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला असून सरकारने अतिवृष्टग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यावा. सरकारने अतिवृष्टी भागात कर्ज वसुली न करण्याचा पहिला आदेश काढावा. तसेच कर्ज वसुली करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्यातील सर्व मंत्री फक्त येऊन माइकमध्ये बोलत आहेत. पण निर्णय कोण घेणार? शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णयच घेतला जात नाही. सरकारला गांभीर्य दिसत नाही. केवळ टिंगल टवाळी सुरू असून डायलॉगबाजीही सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंतराव, बोलघेवडेपणा सोडा

यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. जयंत पाटलांनी आम्हाला खरं खोटं ठरवण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. बोलघेवडेपणा सोडून थेट कृती करून दाखवावी, असा टोलाही त्यांनी लगावला. इथे रस्त्यावरच शेत आहे. दहा दिवस झाले तरी या शेताचा अजून पंचनामा झालेला नाही. पालकमंत्रीही पाहणी करायला आले नसल्याच्या तक्रारी आहेत. पालकमंत्री आले नसतील तर त्यांनी या भागात यावं, असंही त्यांनी सांगितलं. (devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

संबंधित बातम्या:

Live Update : मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू

कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करा, उस्मानाबाद शिवसेना मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्षबिक्ष येऊच शकत नाही

(devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा