AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाचे खरे शिल्पकार कोण? देवेंद्र फडणवीस यांनी दिले या लोकांना श्रेय

देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केले आहे. अनेकांनी आपल्या कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने देवाभाऊ म्हणत, ही सर्व तुमची मेहनत असल्याचे म्हटले आहे. आणखी एक युजर शपथविधी समारंभाचे निमंत्रण कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत आहे.

विजयाचे खरे शिल्पकार कोण? देवेंद्र फडणवीस यांनी दिले या लोकांना श्रेय
devendra fadnavis
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 25, 2024 | 9:58 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या निवडणुकीचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला जात आहे. देवेंद्र फडणवीस राज्यातील राजकारणाचे नवीन चाणक्य ठरले असल्याचे म्हटले जात आहे. कारण आतापर्यत भाजपला इतक यश कधी मिळाले नव्हते. परंतु २०२४ मध्ये भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. त्यासंदर्भात X वर ट्विट करत त्यांनी मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद यांना श्रेय दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने विश्वास दाखवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले?

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे भावनिक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे.

यशाचे श्रेय यांना दिले

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.

आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटला अनेकांनी लाईक केले आहे. अनेकांनी आपल्या कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने देवाभाऊ म्हणत, ही सर्व तुमची मेहनत असल्याचे म्हटले आहे. आणखी एक युजर शपथविधी समारंभाचे निमंत्रण कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करत आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण