AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याच शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शरद पवार भविष्यात नेमकं काय करणार? असे विचारले जात आहे.

शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा शेवटच्या क्षणी थेट राजीनामा; पक्षात मोठी खळबळ!
SHARAD PAWARImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 30, 2025 | 6:10 PM
Share

Dhule Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीमुळे राज्याती राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज (30 डिसेंबर) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी संताप आणि उद्रेक पाहायला मिळाला. काही ठिकाणी आयारामांना थेट तिकीट देण्यात आल्याने मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे काही नेते शेवटच्या क्षणीदेखील पक्षांतर करताना पाहायला मिळाले. राजकीय सोय पाहून आजदेखील अनेक नेत्यांनी पक्षबदल केला. या सर्व घडामोडी घडत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नेमका कोणी दिला राजीनामा?

मिळालेल्या माहितीनुसार ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या हंगामात धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले या धुळ्यात प्रभाक क्रमांक 1 मधून भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच पत्नीला बळ पुरवण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.

शरद पवार यांना ऐनवेळी मोठा धक्का

भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे तिथे राजकीय खळबळ उडाली आहे. आता रणजित भोसले हे पत्नी उज्ज्वला भोसले यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेत. दुसरकीडे शरद पवार यांच्या पक्षाला मात्र ऐनवेळी मोठा धक्का बसला आहे. भोसले यांच्यामुळे पडलेला खड्डा आता शरद पवार यांचा पक्ष नेमका कसा भरून काढणार? तसेच निवडणुकीच्या विजयासाठी शरद पवार यांचा पक्ष नेमकी कोणती रणनीती आखणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?