AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचं काय झालं?

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते. मात्र आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे.

मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचं काय झालं?
Dipak Borhade
| Updated on: Oct 02, 2025 | 5:04 PM
Share

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते. मात्र आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. 16 दिवस आमरण उपोषण केल्याने दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली होती. समाज बांधवांच्या विनंतीनंतर आपल्या मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. त्यांच्या मागणीचं नेमकं काय झालं? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं

मागील 16 दिवसापासून जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे उपोषण करत होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.16 दिवस आमरण उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी उपचार घेण्याची देखील विनंती केली होती. आता त्यांनी समाज बांधवांच्या विनंतीनंतर आपल्या मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे.

आरक्षणाच्या मागणीचं काय झालं?

दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दीवप बोराडे हे उपचार घेणार आहेत. दीपक बोराडे हे उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी महाजन यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र बोराडे यांनी उपोषण मागे घेतले नव्हते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. बोऱ्हाडे यांच्याशी फोनवर बोलताना फडणवीस यांनी म्हटले होते की, कोणीही काहीही बोलू द्या. मी काहीही लिहून दिलं तरी जोपर्यंत मी चर्चा करत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही. तुम्हालाही माहिती आहे की लोकांनी केसेस केल्या आहेत. आपण आरक्षणाबाबत आपण आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयामुळेही यात अडचणी निर्माण झाल्या. एसटीचे आरक्षण केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मान्यतेने देते. त्यासाठी राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो. मागच्या सरकारने धनगर समाज एसटीत बसत नाही, असा अहवाल पाठवला.आरक्षण अजूनही आपल्याला हातून गेलेलं नाही. तुम्ही चांगला वकील द्या, तुम्ही प्रक्रिया समजून घ्या. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आरक्षण मिळू शकतात नाही. एसटीचे संवैधानिक आरक्षण आहे. त्यामुळे त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही चर्चा करा आपण मार्ग काढू.’

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं