AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्षनेतेपदी असतानाच वेदना होतात का?; उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना संतप्त सवाल

राज्यात केंद्राचे पथक अजून आलेले नाही. आल्यानंतर पाहणी होणार कधी ? पंचनामे होणार कधी,निदर्यीपणे कारभार सुरु असून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी असतानाच वेदना होतात का?; उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना संतप्त सवाल
devendra fadnavis and uddhav thackeray
| Updated on: Oct 01, 2025 | 5:20 PM
Share

राज्यात पुरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. या मागणीनंतर राज्य सरकारने अडीच हजार कोटीची नुकसान भरपाईचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. परंतू ही नुकसान भरपाई अपुरी असून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ आठवून पाहायलाही सांगितले आहे.

आमचे सरकार असताना आपण शेतकरी दारी आला नसतानाही त्यांना कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्यांच्या या संकटावर आता शब्दाचा खेळ केला जात आहे. एखादी गोष्टी कायद्यात बसत नाही. ओला दुष्काळाची कायद्यात संज्ञा नाही, त्यामुले आता ओला दुष्काळग्रस्तांना मदत नाकारणार का असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की समजा ओला दुष्काळ हा शब्द नसेलही. पण माणसाच्या पदानुसार शब्द ही बदलतो का. माझ्याकडे तुमचे एक पत्र आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेता असताना फडणवीस यांनी मला हे पत्र पाठवले होते १६ ऑक्टोबर २०२० हे पत्र दाखवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात ?

विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दुख पाहून वेदना होत आहे, असे तत्कालिन विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का ? मुख्यमंत्री असताना होत नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. आणि ते पुढे म्हणाले की मला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे मी कर्ज माफी केली होती. फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती असेही ते यावेळी म्हणाले.

अजून अभ्यासच सुरु

आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यासाठी कोणाचीही वाट न पाहात कर्जमाफी केली होती. देवेंद्र फडणवीस आता अजूनही अभ्यास करत आहे. प्रस्तावाचा अभ्यास सुरु आहे. केंद्राचे पथक अजून आलेले नाही. आल्यानंतर पाहणी होणार कधी ? पंचनामे होणार कधी,निदर्यीपणे कारभार सुरु असून शेतकऱ्यांची कर्जे माफ करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.