AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड

ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्याच्या समर्थनात मी राहणार आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 4:07 PM
Share

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापाला आहे, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश रद्द केला आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण सुरू झालं, भाजप आणि महविकास आघाडीत इंपेरिकल डेटावरून टोलवाटोलवी होताना पहायला मिळाली. राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत असल्याने निश्चितच त्याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे, जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे

ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्याच्या समर्थनात मी राहणार आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे. मला शिक्षण घेताना आरक्षणामुळेच मदत झाली, ओबीसीमुळे डाँक्टर झालो, तसेच ओबीसीमुळे राजकीय सुरुवात झाली असेही ते म्हणाले, एवढच नाही तर ओबीसी म्हणून ग्रामीण भागातून मी दिल्लीपर्यंत पोहचलो आहे, हे केवळ डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळे अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

आज वंजारी समाजाचा कार्यक्रम आहे, त्याला भागवत कराड उपस्थिती लावणार आहेत, तसेच गुणवतांचा सत्कार सुद्धा करणार आहे, अशी माहितीही दिली. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे, अशातच निवडणुका होत असल्याने, याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे, त्यामुळे निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी ओबीसी समाजातील अनेक घटकांकडून करण्यात आली आहे. तर ओबीसींचे आरक्षण भाजपमुळे गेल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर राज्य सरकारच्या अपयशामुळे ओबीसी आरक्षण गेल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

मोबाईल इंटरनेटशिवाय पेमेंट करा, Paytm ची ‘टॅप टू पे’ सुविधा सुरु, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nude photography exhibition| पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन भरवले म्हणून छायाचित्रकाराला धमकी ; प्रदर्शन तात्काळ बंद अन्यथा……

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.