AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका

मराठवाड्यातील पर्यटनस्थळं बंद असल्याने एकूण 500 कोटींच्या महसुलावर शासनाला पाणी सोडावं लागलं आहे. (Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका
| Updated on: Sep 28, 2020 | 12:54 PM
Share

औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील पर्यटनस्थळं (tourist places) बंद असल्याने एकूण 500 कोटींच्या महसुलावर शासनाला पाणी सोडावं लागलं असून, पाच हजार लोकांचा रोजगार बुडाल्याचंही समोर आलं आहे. (Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद( Aurangabad) शहरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. वेरूळ-अजिंठा, बीबी का मकबरासारखी महत्त्वाची पर्यटनस्थळं बघण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक औरंगाबादेत येतात. पण कोरोनामुळे पर्यटनस्थळेच बंद असल्याने पर्यटकांनीही औरंगाबादकडे पाठ फिरवली आहे. परिणामी सरकारला 500 कोटींचा फटका बसला आहे. तसेच पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या 5000 लोकांचे व्यवसाही बुडाले असून, त्यांच्यासमोर चरितार्थाचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.

जगभरातून पर्यटक येत असल्याने, हॉटेल व्यसायाय(Hotel business)  तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांचंही (travel companies) मोठं जाळं औरंगाबादेत पसरलेलं आहे. पण पर्यटकच नसल्याने हॉटेल व्यवसाय चालवावा तरी असा? प्रश्न हॉटेलच्या मालकांना पडलाय. पर्यटनस्थळं बंद असल्याने हॉटेल व्यवसायावर अवकळा आल्याचं पाहायला मिळतंय. आर्थिक उलाढाल होत नसल्याने हॉटेलच्या मालकांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे प्रकारही घडले आहेत. तर छोटे व्यावसायिक, गाईड्स यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही प्रवासी नसल्याने, फेऱ्या कमी केल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पर्यटनस्थळं बंद असल्याने एकीकडे पर्यटनप्रेमींमध्ये नाराजी आहे. तर व्यवसाय बुडत असल्याने मराठवाड्यातील पर्यटनस्थळं अटी-शर्थींसह सुरु करावीत, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. “कोरोनामुळे आमचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत, तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळं लवकर खुली करावीत” अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘कलम 144’ लागू, सामूहिक पर्यटनाला बंदी

World Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल, पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

World Tourism Day | जागतिक पर्यटन दिन का साजरा करतात? यंदाची संकल्पना काय?

पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात

Konkan Beach Shacks | आदित्य ठाकरेंचा पुढाकार, गोव्याची मजा कोकणात, बीच शॅक्सने स्थानिकांना 80 टक्के रोजगार

Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची पाठ

(Due to closure of tourist places in Corona pandemic jobs and revenue lost In Marathwada)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.