AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरेंना आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.

ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण
| Updated on: Feb 16, 2025 | 10:28 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, हे तुम्ही पाहात आहात. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली, ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा, असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, लोक स्वतःहून पक्षात येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. विकास विरोधी जे आहेत त्यांना कार्यकर्ते सोडत आहेत, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप द्या, मात्र काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या शाप देतात. कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात यश मिळाले आहे, अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीमागे थांबण नेत्याचं काम आहे. पाठीशी उभे राहणारे नेते पाहिजेत नाही तर आप आगे बढो हम कपडे सभालते हें अस नको व्हायला, असा टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

महादजी शिंदे पुरस्कार मला मिळाला, मात्र पोटदुखी काय थांबेना,गेल्या अडीच वर्षांपासून ही पोटदुखी सुरूच आहे औषध जर कंपाउंडर देतो तर रोगावर इलाज होईलच कसा? असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Follow Us
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?