AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय…, संग्रामबापू भंडारेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे चांगलेच चर्चेत आले होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा जालन्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय..., संग्रामबापू भंडारेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2025 | 4:55 PM
Share

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे हे चांगलेच चर्चेमध्ये आले होते, त्यांच्यावर टीका देखील झाली होती, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते जालन्यात बोलत होते. गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भंडारे? 

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे? भारतातील एका नटाकडून हरिण मारले गेले, तेव्हा बिश्नोई समाजाने मागणी केली होती की माफी मागा. पण तेव्हा दाऊदचा काळ होता, खान कुठे माफी मागतो?  परंतू बिश्नोई समाजाच्या घरामधील एक छोटं पोरगं मोठं झालं, त्याचं नाव लॉरेन्स बिश्नोई, त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते काही खिसे कापणे, चाकू दाखवणे असे नाहीत. तो परदेशात फोन लावतो, कोणत्याही देशात जा, त्याचे सात -आठ कार्यकर्ते आहेतच.

त्याने खानला मेसेज टाकायची सुरुवात केली की मी तुला ठोकणार आहे, देशभर एक मेसेज निर्माण झाला की हरीण मारलं की लॉरेन्स ठोकतो. त्यामुळे देशातील हरणं सुरक्षित झाले, आता गाय वाचवण्यासाठी जी परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. जालन्यातील अनवा गावांमध्ये गाईची आणि देवळाची विटंबना झाली, यांच्या टारगेटवर गाई आणि देऊळ आहेत, पोलिसांनीही  हिंदूच्या पाठीमागे उभा राहावं, असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे.

गावात जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले, तर दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशभरातील मंदिरांना सरकारच्या वतीने कॅमेरे लावले पाहिजेत.  महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी, भगवाधारी बनवायचा आहे, असंही यावेळी संग्रामबापू भंडारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील काही दिवसांपूर्वी त्यांचा चांगलाच वाद झाला होता.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.