AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना, परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, उभं पिक दिलं पेटवून

पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कोरोना, परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, उभं पिक दिलं पेटवून
| Edited By: | Updated on: Oct 31, 2020 | 5:15 PM
Share

गोंदिया : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अशात आता शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आधीच मोठं नुकसान झालं असताना आता कापणीला आलेल्या धानपिकाला मावा तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांचं धान्य खराब झालं असल्याने आता शेतकरी उभा धानपिक कापण्या योग्य नसल्याने शेतकरी धानपिकाला आग लावत आहेत. (Farmers crops were damaged due to Insects in gondiya)

पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पूर्व विदर्भात सगळ्यात जास्त धान्य पीक भंडारा गोंदिया जिल्ह्यात लागवट केला जातो. शेतकरी राबराब राबत शेतात काम करतो. मात्र, शेवटी त्यांच्या पदरात निराशाच येत. या वर्षी महापूर, कोरोना या संकटात असताना आता हाता तोंडाशी आलेलं पीक मावा तुडतुडा या रोगामुळे पूर्णतः नष्ट झालं आहे.

खरंतर, शेतकऱ्यांना शेती लागवड करताना पेरणी, रोवणी, खते, बी, बियाणे याला लागणार खर्च एकरी 20 हजार रुपये येतो. मात्र, आता मावा तुडतुडा रोगामुळे धानपिक पूर्णतः नष्ट झालं असून शेतकऱ्यांना धानपिक कापणीलाही परवडत नसल्याने आता शेतकऱ्यांनी उभी पिकं पेटवून दिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकटाचं सावट निर्माण झालं आहे.

शेतीतून असा नफा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून जनावरं पालन करतात. पण शेतीच नाही पैसाच नाही म्हटल्यावर जनावरांना चारा तरी कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

इतर बातम्या – 

कांद्याने वांधा केल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार, मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता
US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(Farmers crops were damaged due to Insects in gondiya)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.