AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच घरात चार मृतदेह! अख्खं कुटुंबच संपलं… आत्महत्या की घातपात? वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हादरलं

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन आणले असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

एकाच घरात चार मृतदेह! अख्खं कुटुंबच संपलं... आत्महत्या की घातपात? वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हादरलं
वाशिमImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 3:28 PM
Share

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिले वडिलांनी पत्नी आणि दोन्ही मुलांना विहिरीत ठरलले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पण महिलेच्या भावाने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी आपल्या पत्नीसह मुलगी जानव्ही बकाल वय वर्षे ७ वर्षे व मुलगा सोहम बकाल वय ५ वर्षे दोन चिमुकल्याना विहिरीत टाकून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र ही आत्महत्या की घात पात याचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मृत महिलेच्या भावाने मात्र घातपात केल्या असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

भावाने केली पोलिसात तक्रार

मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या प्रकरणात घातपाताचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष बकाल यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांचे ध्वनिमुद्रण अर्थात रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, या संदर्भात यापूर्वी अनेक वेळा पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कुटुंबीयांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन आणले असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...