AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात

आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात
गोंदियात वीज पडून 3 गोठे जळाले
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2022 | 3:07 PM
Share

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेधारणी येथे वीज पडून महिलाचा मृत्यू झाला. लीला योगराज हिडामे असं महिलेचं नाव आहे. त्या शेतात पेरणीसाठी गेल्या होत्या. तर दुसरीकडं, जिल्ह्यामधील आमगाव ( Amgaon) तालुक्यातील नंगपुरा येथे वीज कोसळली. यात शेतकरी दशरथ टेंभरे (Dashrath Tembhare) परिवारातील तीन भावंडांचे गोठे रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाले. या तीन गोठ्यात 195 पोते धान, शेतीची अवजारे आणि 6 बकऱ्या या आगीत भस्मसात झालेत. या तिन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले. वेळीच सावध झाल्याने तेथे राहणाऱ्या लोकांचा जीव वाचविण्यात यश आले. मात्र त्याठिकाणी ठेवलेले सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून नष्ट झाले. वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत धान्य आणि जनावरे जळून गेली होती. दशरथ टेंभरे व हेमंत टेंभरे (Hemant Tembhare) यांनी शासनास नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

धान्यासह शेतीची अवजारे जळाली

गोंदिया जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातवरण आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीशा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर घातली होती. पण, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. पण, वीज पडल्यामुळं तीन गोठ्यांचे नुकसान झाले. गोठे जळून खाक झाले. ही घटना आमगाव तालुक्यातील नंगपुरा येथे घडली. आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज पडून महिलेचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील साले धारणी पोस्ट डोंगरगाव डेपो येथे वीज पडली. यात लीला योगराज हिडामे यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात पेरणी करण्याकरिता लीला गेल्या होत्या. बारा वाजता जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला. महिलेच्या बाजूला वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...