AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात

आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Gondia Accident | सालेधारणीत वीज पडून महिलेचा मृत्यू, आमगावात 3 गोठे जळाले, आगीत 6 बकऱ्या भस्मसात
गोंदियात वीज पडून 3 गोठे जळाले
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2022 | 3:07 PM
Share

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेधारणी येथे वीज पडून महिलाचा मृत्यू झाला. लीला योगराज हिडामे असं महिलेचं नाव आहे. त्या शेतात पेरणीसाठी गेल्या होत्या. तर दुसरीकडं, जिल्ह्यामधील आमगाव ( Amgaon) तालुक्यातील नंगपुरा येथे वीज कोसळली. यात शेतकरी दशरथ टेंभरे (Dashrath Tembhare) परिवारातील तीन भावंडांचे गोठे रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाले. या तीन गोठ्यात 195 पोते धान, शेतीची अवजारे आणि 6 बकऱ्या या आगीत भस्मसात झालेत. या तिन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले. वेळीच सावध झाल्याने तेथे राहणाऱ्या लोकांचा जीव वाचविण्यात यश आले. मात्र त्याठिकाणी ठेवलेले सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून नष्ट झाले. वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत धान्य आणि जनावरे जळून गेली होती. दशरथ टेंभरे व हेमंत टेंभरे (Hemant Tembhare) यांनी शासनास नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

धान्यासह शेतीची अवजारे जळाली

गोंदिया जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातवरण आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीशा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर घातली होती. पण, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, पावसामुळं शेतीच्या कामाला वेग आला आहे. पण, वीज पडल्यामुळं तीन गोठ्यांचे नुकसान झाले. गोठे जळून खाक झाले. ही घटना आमगाव तालुक्यातील नंगपुरा येथे घडली. आगीचे रूप पाहून घरचे लोकं बाहेर आले. त्यामुळं त्यांचे प्राण वाचू शकले. पण, बकऱ्यांचा बळी गेला. घरी असलेले धानही जळून भस्मसात झाले. शेतीची अवजारेही जळून खाक झाली. त्यामुळं नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज पडून महिलेचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील साले धारणी पोस्ट डोंगरगाव डेपो येथे वीज पडली. यात लीला योगराज हिडामे यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात पेरणी करण्याकरिता लीला गेल्या होत्या. बारा वाजता जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला. महिलेच्या बाजूला वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?