AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : दिवस-रात्र सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांकडून एका बाबतीत सरकारच कौतुक

Sanjay Raut : "सावरकरांनी ज्या समुद्रात उडी मारली तिथे तुम्ही डोकं टेकवाल... हे आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाहीये"

Sanjay Raut : दिवस-रात्र सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊतांकडून एका बाबतीत सरकारच कौतुक
Sanjay Raut
| Updated on: May 28, 2025 | 11:02 AM
Share

“वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्वागतार्ह आहे. हा आपला ठेवा आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील राहतं घर सरकारनं ताब्यात घेतलं. तिथे मेमोरियल केलं. त्याचं स्वागत करतो” असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत नेहमी सरकारवर टीका करत असतात. पण आज त्यांनी वीर सावरकरांच्या मुद्यावरुन सरकारच कौतुक केलं. “वाघ नखं आणली. तलवार आणली. त्यावर वाद आहे. वाघ नखं कुठे आहेत? निवडणुकीच्या आधी प्रदर्शनात फिरवली. आता वाघ नखांचं काय झालं?” असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला.

“नागपूरच्या भोसल्यांची तलवार आणली जाणार आहे. ठिक आहे. पण वीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती, बॅरिस्टरी. त्याबाबत फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्याला विरोध नाही. पण खरी पदवी आणा. कागदाचा तुकडा ब्रिटिशांनी जप्त केला तरी आम्ही सावरकरांना बॅरिस्टरच मानतो” असं संजय राऊत म्हणाले. “पण या देशाची मागणी जी आहे, ती वीर सावरकर यांना भारत रत्न देण्याची आहे. काल पद्म पुरस्करांचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होतं की यावेळी तरी सावरकरांना भारत रत्न दिलं जाईल. आम्ही किती काळ वाट पाहिली. तुम्ही पदव्या आणाल. टोप्या आणाल. पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे. त्यांच्या विचारधारेत आहे. त्यामुळे त्यांना भारत रत्न देऊन टीकाकारांचे तोंड बंद केलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

‘त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाही’

“आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ती शिफारस का केली नाही? मोदी आणि शाह यांनी त्यांच्या अख्तयारीत असताना, हातात असताना सावरकरांना भारत रत्न का दिला नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “बॅरिस्टरची पदवी आणा… सावरकरांनी ज्या समुद्रात उडी मारली तिथे तुम्ही डोकं टेकवाल… हे आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाहीये. जेव्हा फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता. तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने दिली होती. महाराष्ट्राने सावरकरांचा सन्मान केला होता” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक