जरांगे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? असं सदावर्ते का म्हणाले? त्यानंतर पाटलांना थेट चॅलेंजच देऊन टाकलं
मनोज जरांगे पाटील हे येत्या 16 मे रोजी आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहेत, दरम्यान यावरून पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील शांतीलाल झुंगे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते जालन्यामध्ये आले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे, येत्या 16 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे हे काही नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारखा सांगायला. 16 तारीख कशासाठी निवडली? असा हल्लाबोल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, यावरून देखील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते हे आज जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील शांतीलाल झुंगे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना खोचक टेला लगावला आहे. मनोज जरांगे पाटील हे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारीख सांगायला. त्यांनी 16 तारीखच का निवडली, हे त्यांनी सांगावं असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा सुफडासाफ झाला आहे. बीड जिल्ह्यातल्या एकाही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता नाही. त्यामुळे जरांगे यांनी सासुरवाडीच्या नवे तर स्वतःच्या ग्रामपंचायतीत सदस्य व्हावं असं थेट चॅलेंज देखील यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, यावरून देखील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत येऊन गेले आणि जरांगे यांनी उद्योग सुरू केले. एकीकडे तारखा द्यायच्या आणि दुसरीकडे रेतीचा उपसा करायचा, त्यांचे रेतीचे टिप्पर मोजायला आता मला माणूस सोडावा लागेल असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
