.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंनी अस्वस्थ होण्याचं कारण काय?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही.

नारायण राणेंनी अस्वस्थ होण्याचं कारण काय?, बाळासाहेब थोरात म्हणाले...
बाळासाहेब थोरातांची नारायण राणेंवर टीकाImage Credit source: social media
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 02, 2022 | 6:05 PM
Share

रमेश चेंडगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, हिंगोली : राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली. काँग्रेस संपली काँग्रेसला आता कुणी वाली राहिला नाही, असं विधान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले होते. यावर बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भारत जोडो पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघितल्यानंतर ते अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थेतून ते काहीही बोलत आहेत, असं थोरात म्हणाले.

आशिष शेलारांचं ट्वीट

काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस देणार हात.आशिष शेलारांनी ट्विट केलंय. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ही पदयात्रा चालली आहे. यात्रा प्रतिसाद आपण पाहत आहोत.

मुद्दाम आपण पाहावं की, कर्नाटकात हजारोनं लोक पाठीशी चालत आहेत. हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झाली आहे. ते अस्वस्थ होण्यातून बोलताहेत. याला काही महत्त्व नाही. काँग्रेसचा विचार हा दूरगामी देशाला मोठा करणारा विचार आहे.

आपल्या राज्य राज्यघटनेतले मूलभूत तत्व आमचा विचार आहे. तो शास्वत विचार आहेत. आम्ही हा शास्वत विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. भेद निर्माण करणाऱ्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे.

ही तर व्यक्तिगत बाब

शासकीय कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे लागणार, असा शासन निर्णय सारकारकडून काढण्यात आलाय. यावर थोरातांनी ही बाब व्यक्तिगत आहे म्हटलं.

आपण कोणी भेटलं तर, वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही. मात्र यावर त्यांनी जीआर काढला. मात्र ही व्यक्तिगत बाब असल्याचं थोरात म्हणाले.

Follow Us
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?