AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंनी अस्वस्थ होण्याचं कारण काय?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही.

नारायण राणेंनी अस्वस्थ होण्याचं कारण काय?, बाळासाहेब थोरात म्हणाले...
बाळासाहेब थोरातांची नारायण राणेंवर टीकाImage Credit source: social media
| Updated on: Oct 02, 2022 | 6:05 PM
Share

रमेश चेंडगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, हिंगोली : राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली. काँग्रेस संपली काँग्रेसला आता कुणी वाली राहिला नाही, असं विधान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले होते. यावर बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भारत जोडो पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघितल्यानंतर ते अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थेतून ते काहीही बोलत आहेत, असं थोरात म्हणाले.

आशिष शेलारांचं ट्वीट

काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस देणार हात.आशिष शेलारांनी ट्विट केलंय. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ही पदयात्रा चालली आहे. यात्रा प्रतिसाद आपण पाहत आहोत.

मुद्दाम आपण पाहावं की, कर्नाटकात हजारोनं लोक पाठीशी चालत आहेत. हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झाली आहे. ते अस्वस्थ होण्यातून बोलताहेत. याला काही महत्त्व नाही. काँग्रेसचा विचार हा दूरगामी देशाला मोठा करणारा विचार आहे.

आपल्या राज्य राज्यघटनेतले मूलभूत तत्व आमचा विचार आहे. तो शास्वत विचार आहेत. आम्ही हा शास्वत विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. भेद निर्माण करणाऱ्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे.

ही तर व्यक्तिगत बाब

शासकीय कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे लागणार, असा शासन निर्णय सारकारकडून काढण्यात आलाय. यावर थोरातांनी ही बाब व्यक्तिगत आहे म्हटलं.

आपण कोणी भेटलं तर, वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही. मात्र यावर त्यांनी जीआर काढला. मात्र ही व्यक्तिगत बाब असल्याचं थोरात म्हणाले.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.