AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं

जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे.

अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं
uddhav thackeray (1)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 19, 2024 | 9:40 PM
Share

लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हापासून आपली लढाई सुरु झाली आहे. अजूनही ही लढाई सुरूच आहे. आता आपण मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक लढतोय. या जागा आपल्या हव्याच. त्या मला जिंकून पाहिजेत. नाशिक शिक्षक मतदारसंघही मला जिंकून पाहिजे. दोन्ही विजय मला हवे आहेत. जी लढाई सुरु झाली आहे ती सुरूच रहाणार आहे. आता थांबायचे नाही. शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही. 11 विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत. त्याची निवडणूक होणार आहे. आमदारांच्या मतांवर ही निवडणूक होत आहे. पण, ज्याच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते आमदार निवडणुकीत मतदान कसे करू शकतात? निवडणूक प्रक्रिया सुरु केलीच कशी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक सुरू झाली आहे. विधानसभेतील आमदार ते 11 आमदार निवडून देणार आहे. पण, गद्दार आमदारांचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे असे असताना ही निवडणूक होऊच कशी शकते. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक कशी होऊ शकते? आता म्हणतील की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण, ही प्रक्रिया सुरूच कशी झाली. अपात्र आमदार, गद्दार आमदार मतदान करूच कसे शकतात असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेनेचा निर्णया व्हायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे कोर्टाला विनंती आहे की आणखी किती वेळ घेणार आहात? ते 40 आमदार अपात्र झाले तर निवडणूक होऊ शकेल का? जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे. पण, त्याला विलंब लागत असेल तर कसे चालेल. न्याय मेला तर कसे होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात जाऊ द्या ना घरी. आता वाजवले की बारा. वाजले की बारा. तिकडचे ते म्हणतात नाही और सत्यानाश करो. काही झालं तर जबाबदारी घ्यायची ताकद नाही असे सरकार चालले आहे. पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत. आपल्या विजय पाहिजे. मुंबईत आणि नाशिकमध्ये. लढाई लढायची आहे. लढाई सुरू झाली आहे. ही लढाई वैयक्तिक नाही. ही लोकशाहीची आणि संविधानाची, न्याय्याची लढाई आहे. ती जिंकायलाच हवी असे ते म्हणाले.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....