AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंधळ घालून सरकार बदनाम करण्याचं षडयंत्र, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कसं?

आधी चौकशी करणार की, नाही. सरळ फाशी लावणार का, असा थेट आरोप त्यांनी केला. आधी चौकशी करा. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

गोंधळ घालून सरकार बदनाम करण्याचं षडयंत्र, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कसं?
गुलाबराव पाटील
| Edited By: | Updated on: Dec 26, 2022 | 4:28 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जातात. सरकार निष्क्रिय आहे, असेही आरोप केले जातात. यावर बोलताना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आरोप-प्रत्यारोपाची काही हद्द असते. नागपूरला अधिवेशन घ्या, असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी वल्गना केली जाते. प्रत्येक्षात करोडो रुपये अधिवेशनावर खर्च होतात. तिथं कामकाज केलं जात नाही. ही निंदनीय बाब आहे. चर्चेद्वारे सर्व गोष्टी सोडविल्या जाऊ शकतात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. नुसता गोंधळ घालायचा नि सरकार बदनाम करायचं असं षडयंत्र सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गायरान जमिनीचा घोटाळा असल्याचा आरोप केला जातो. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आधी चौकशी करणार की, नाही. सरळ फाशी लावणार का, असा थेट आरोप त्यांनी केला. आधी चौकशी करा. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

सरकारचं काम बंद पाडायचं. लोकांना न्याय मिळाला पाहिजे तो मिळू द्यायचा नाही. ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही. जनतेची काम होत नसल्याचा आरोप होतो. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, विरोधी पक्ष याला जबाबदार आहे. कुणी टाळ्या वाजवतंय कुणी प्रश्न विचारतंय. सरकार बदनाम करण्याचं छडयंत्र आहे.

एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संत, महंत जे-जे असतील, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. ४०० कोटी रुपयांचं उत्खनन केलेलं आहे. १५ दिवसांत एनएची आर्डर मिळणं, १५ दिवसांत उत्खनन करणं, या बाबी समोर आल्या. याची चौकशी झाली पाहिजे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...