आमच्या मतामुळे तुम्ही मुख्यमंत्री बनलात, आम्ही घरी येऊन तुम्हाला… उद्धव ठाकरेंच्या विधानावर बच्चू कडूंचा पलटवार
Bachchu Kadu : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला होता. मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं म्हटलं. यावर आता बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे.

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला होता. मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होती. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला होता असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
