AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!

मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 8 जुलै रोजी नुंदरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!
imd weather updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 4:34 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक या भागात मोठा पाऊस झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात नागरिकांना मोठ्या अडचणी आल्या. नाशिकला तर ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. परंतु सुदैवाने नाशिकवरील हे संकट टळले. दरम्यान, आता 12 जुलैपर्यंतचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा नवा अंदाज काय?

मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 8 जुलै रोजी नुंदरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक या शहरांना यलो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

येत्या 9 जुलै रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल, सातारा घाट, पुणे घाट भागाला ऑरेंज अलर्ट असेल. 10 आणि 11 जुलै रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. तर 12 जुलै रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.

महाराष्ट्रात काही ठिकाणी जीवितहानी

दरम्यान, सध्या मुंबई आणि उपगरात पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वसई-विरार भागात सर्वाधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पावसामुळे काही दुर्घटना घडल्या आहेत. पाण्यात बुडून, पाण्यात वाहून गेल्याने राज्यात काही मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी सध्या समोर आलेला हवामान अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा