AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासंदर्भात देखील मोठी बातमी समोर आली आहे.

IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?
IMD weather updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 5:06 PM
Share

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं, देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान आता तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांना हाय अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा अशा 17 रांज्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची देखील शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची तूट झाली आहे, सोलापूर जिल्ह्यात तब्बल 33 टक्के इतकी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने, पावसाची तूट निर्माण झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच असून, पुढील दोन महिने महाराष्ट्रात सरासरी पावसाची अपेक्षा आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस.डी सानप यांनी वर्तवला आहे.  यंदा राज्यात पावसाचं प्रमाणा हे असमान राहिलं आहे, काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे.

Follow Us
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी