AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट

पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला, दरम्यान त्यानंतर आता महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट घोंघावत असून, हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 5:01 PM
Share

यंदा महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला, त्यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. खरीप हंगाम हातचा गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले. अनेक ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरांमुळे शेताचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान राज्यातून आता पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात पावसाचा जोर ओसरला असं दिसत असतानाच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशार्‍यानुसार पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील तापमान पुढील दोन ते तीन दिवस जैसे थे राहण्याची शक्यता आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, मात्र त्यानंतर हळुहळु तापमान कमी होऊन राज्यात गारठा वाढू शकतो. मात्र पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं मोठं संकट असणार आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तर मराठवाड्यात धाराशिव, लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये तर पश्चि महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे.

राज्यात थंडी केव्हा? 

पुढील तीन ते चार दिवस राज्यातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीये, मात्र त्यानंतर हळुहळु तापमान कमी होऊन राज्यात गारठा वाढू शकतो असा अंदाज आहे. पुढील तीन ते चार दिवस तरी अजून राज्यावर पावसाचं संकट कायम आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रब्बी हंगामातील पेरणीला पावसामुळे विलंब होण्याची शक्यता आहे.

NCP आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं? पुढील सुनावणी कधी?
NCP आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं? पुढील सुनावणी कधी?.
ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?
ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?.
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?.
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक.
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना.
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू...
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू....
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्..
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्...
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप.
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण..
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण...
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी
धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी.