AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 10, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Mahrashtra corona) होत आहे. दररोज जवळपास 50 हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra weekend lockdown) आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने लिहिलं आहे. माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड (Ex MLC Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निर्बंध आहेत, त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. महिनाभर असंच सुरु राहिलं तर नियंत्रणाबाहेर जाईल आणि आरोग्य यंत्रणा फेल झाल्याचं दिसेल. परिणामी महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी होईल, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.

हरिभाऊ राठोड यांचं पत्र जसंच्या तसं

मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म.रा. मंत्रालय मुंबई

विषय:- २८ दिवसाचा लॉगडाऊन लावण्याबाबत…

महोदय,

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लॉक डाऊन, मिनी लॉकडाउन, वेगवेगळी बंधने, लावली जात आहेत. सर्व जिल्ह्यात एक सारखी परिस्थिती नाही ,ही संपूर्णतः गोंधळाची स्थिती आहे. राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, आणि दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. कदाचित एक महिन्यानंतर हे अनकंट्रोल होईल.यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली दिसेल.अशा परिस्थितीमध्ये, राज्याची नाहक बदनामी होईल, आणि जनतेच्या स्वाथासाठी सुद्धा हे हानिकारक राहील. माझी आपणास विनंती आहे, कुणाचीही तमा न बाळगता, कडक धोरण स्वीकारावे लागेन, कोरोनाची साखळी तोडावी लागेन, तरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो. असा माझा ठाम विश्वास आहे.

२८ दिवसाचा लॉगडाऊन जाहीर करावा, हे जाहीर करतांना ५ दिवस आधी तो जाहीर करावा, सर्व पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अत्यावश्यक सेवा यांना सतर्क ठेवावे. या काळामध्ये चीट पाखरूही बाहेर दिसू नये, असे कडक धोरण अवलंबविण्यात यावे.

लॉगडाऊन ची घोषणा करतांना काही गटांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, उदा. शेतमजूर, इमारत बांधकाम मजूर , ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर,घरेलू कामगार आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी प्रत्येक कमीत कमी ५ हजार रु.ची घोषणा करावी.

धन्यवाद..

आपला हरिभाऊ राठोड माजी वि.प.स.

VIDEO : 28 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावा

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

Vijay Wadettiwar EXCLUSIVE | राज्यात 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज, विजय वडेट्टीवारांचे संकेत

(Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.