AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

महिनाभरात परिस्थिती अनकंट्रोल होईल, 28 दिवसांचा लॉकडाऊन करा, माजी खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Apr 10, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Mahrashtra corona) होत आहे. दररोज जवळपास 50 हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra weekend lockdown) आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी खासदाराने लिहिलं आहे. माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड (Ex MLC Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निर्बंध आहेत, त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. महिनाभर असंच सुरु राहिलं तर नियंत्रणाबाहेर जाईल आणि आरोग्य यंत्रणा फेल झाल्याचं दिसेल. परिणामी महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी होईल, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.

हरिभाऊ राठोड यांचं पत्र जसंच्या तसं

मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म.रा. मंत्रालय मुंबई

विषय:- २८ दिवसाचा लॉगडाऊन लावण्याबाबत…

महोदय,

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लॉक डाऊन, मिनी लॉकडाउन, वेगवेगळी बंधने, लावली जात आहेत. सर्व जिल्ह्यात एक सारखी परिस्थिती नाही ,ही संपूर्णतः गोंधळाची स्थिती आहे. राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहे, आणि दिवसागणिक हा आकडा वाढत चालला आहे. कदाचित एक महिन्यानंतर हे अनकंट्रोल होईल.यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे फेल झालेली दिसेल.अशा परिस्थितीमध्ये, राज्याची नाहक बदनामी होईल, आणि जनतेच्या स्वाथासाठी सुद्धा हे हानिकारक राहील. माझी आपणास विनंती आहे, कुणाचीही तमा न बाळगता, कडक धोरण स्वीकारावे लागेन, कोरोनाची साखळी तोडावी लागेन, तरच आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो. असा माझा ठाम विश्वास आहे.

२८ दिवसाचा लॉगडाऊन जाहीर करावा, हे जाहीर करतांना ५ दिवस आधी तो जाहीर करावा, सर्व पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, अत्यावश्यक सेवा यांना सतर्क ठेवावे. या काळामध्ये चीट पाखरूही बाहेर दिसू नये, असे कडक धोरण अवलंबविण्यात यावे.

लॉगडाऊन ची घोषणा करतांना काही गटांना आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, उदा. शेतमजूर, इमारत बांधकाम मजूर , ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर,घरेलू कामगार आणि बारा बलुतेदार यांच्यासाठी प्रत्येक कमीत कमी ५ हजार रु.ची घोषणा करावी.

धन्यवाद..

आपला हरिभाऊ राठोड माजी वि.प.स.

VIDEO : 28 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावा

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

Vijay Wadettiwar EXCLUSIVE | राज्यात 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज, विजय वडेट्टीवारांचे संकेत

(Impose 28 days lockdown in Maharashtra Ex MLC Haribhau Rathod writes to CM Uddhav Thackeray)

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप