AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला…

नाशिक येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये सत्ता येताच केलेल्या कामांना उजाळा दिला.

राज ठाकरे म्हणाले, समोर क्रिकेटचं बोर्ड आहे, त्यावर टोटल लिहिलंय, तुम्ही मला...
Raj Thackeray
| Updated on: Jan 09, 2026 | 11:33 PM
Share

राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा नाशिक पालिकेवर ७०० कोटीचे कर्ज होते. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली आहे. आमच्या पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट, तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन असा दम दिला.नाशिकमध्ये उत्तम रस्ते झाले आणि हे होऊ शकते. या लोकांना कळू शकत नाही. पाच वर्षात फडणवीस येऊन काय बोलून गेले. ते झालं का सांगा असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, उड्डाण पूल, रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, आदिवासी प्रबोधिनी अशा घोषणा केल्या होत्या.राज ठाकरे पुढे म्हणाले की,’ देवेंद्र फडणवीस यांनी काही केले नाही आणि म्हणे नाशिक दत्तक घेणार धर्माच्या नावावर झुंजवत आहे. लाडकी बहीण योजनेत दीड हजार दिले. महागाई किती वाढली. तुमचे दीड हजार निघून गेले. सिलिंडर १५०० रुपये. कुठे टिकणार आहे दीड हजार रुपये. तुमची मुलं काय विचार करतील.आमच्या भवितव्याकडे कोणी पाहिलं नाही. का तर आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले. आमचं भविष्य असंच गेल असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहेत. कशाचा काही आटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. आजही तेच चालू आहे. आज पैसे घ्याल. किती दिवस पैसे टिकणार आहे. तेवढ्या किंमतीसाठी शहर दावणीला बांधत आहोत. याचाही विसर पडला असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ?

राज ठाकरे यांनी कशासाठी निवडणुका लढवायच्या. निवडणुका हा नुसता खेळ केलाय का ? पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पाच वर्ष बोंबलत राहायचं. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा तुम्ही असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले की  तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्याशिवाय आपलं राहणार नाही असेही आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे पुढे म्हणाले की क्रिकेटचा बोर्ड आहे, समोर. तिथे लिहिलंय टोटल. शिवसेना आणि मनसेचे किती नगरसेवक निवडून देणार. मला तिथे १०० चा आकडा पाहिजे. कुठेही गाफिल राहू नका. सज्ज व्हा असे आदेश राज ठाकर यांनी यावेळी दिला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत