AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा काय?

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

नागपूरमध्ये मोसमातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, आज अमरावतीला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा काय?
Red Alert
| Updated on: May 21, 2026 | 11:26 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आज राज्यातील तब्बल 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला. अमरावतीला आज उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. आज पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अमरावतीत मागील आठवड्याभरापासून विक्रमी तापमानाची नोंद करण्यात येत आहे.  मागील पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 46 अंशाच्या वरती जात आहे.. शनिवारी पारा 46 अंशवर गेला.. मागील चार पाच दिवसांपासून पारा 46 अंशावर पोहोचला.. काल 46.04 होता तर आज उष्णतेचा रेड अलर्ट दिल्याने आजही पारा 46 च्या वर जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे नागरिकांची गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे असं आवाहन हवामान खात्याने केला आहे. अजून काही दिवस पारा असाच राहील असं हवामान खात्याने सांगितले आहे…

नागपूर शहरात काल तापमान 46.6 अंशावर गेल असून शहरात प्रकारे उन्हाचा आगडोब पसरला. दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस कालचा ठरला. दुपारनंतर रस्ते ओस पडले कुलर पंख्यातूनही गरम हवा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. आजही तापमान वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. यापूर्वी 27 मे 2024 रोजी नागपुरात 45.6 °c तापमानाची नोंद झाली होती.

मात्र, यंदाच्या मे महिन्यात उष्णतेने अधिकच भीषण रूप धारण केले आहे.  विशेष म्हणजे नागपुरातील कालचे तापमान मे महिन्यातील सर्वाधिक तापमान होते. 23 मे 2013 रोजी नागपूरत 47.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जातो. हवामान तज्ञांच्या मते यंदा पारा आणखी वाढून जुने विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवस पारा चाळिशीवर राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज. तर 21 ते 24 मे या कालावधीत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, अशीही शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे. मुंबईत अजूनही मान्सूनपूर्व सरींनी उपस्थिती लावलेली नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा