AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. आज उष्णतेचा कहर बघायला मिळेल. तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला. यासोबत काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..
Red alert in Amravati Wardha and Akola
| Updated on: May 21, 2026 | 7:24 AM
Share

राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. काल राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज नागपूर, यवतमाळ, आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. जवळपास जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. त्यामध्येच आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. महाबळेश्वर येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 18.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मराठवाडा आणि विदर्भात सूर्य आग ओकत आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. वर्ध्याचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदाच्या मोसमातील तापमानाचा नवा उच्चांक बघायला मिळतोय. यंदा देशातील उष्ण शहरांपैकी वर्धा शहर ठरत आहे. मागील सलग दोन दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली.

मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढ होत आहे.  तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून अलर्टही जारी करण्यात आला. देऊळगावराजा शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. तब्बल 20 दिवसांनंतरही अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने हजारो महिला-पुरुषांनी थेट नगरपालिकेवर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. उष्णता वाढत असल्याने पाण्याची पातळी घसरत आहे.

भंडारा, जळगाव, गोदिंया, वाशिम, परभणी, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट दिल्याने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णघाताच्या रूग्णांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. उष्णघातापासून दूर राहण्याकरिता नक्की काय काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. जास्तीत जास्त पाणी उष्णघातापासून दूर राहण्याकरिता प्यावे.

Follow Us
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...