AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..

Maharashtra Rain Update : राज्यात आज पावसाचा इशारा काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आला. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामध्येच अनेक भागात रात्री पाऊस झाला असून सकाळीही ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला.

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..
Maharashtra Rain
| Updated on: Jul 15, 2026 | 7:11 AM
Share

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू, डेहराडून, पटना ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसली. राज्यात 20 जुलैनंतर पुन्हा एकदा पूर्ण मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला.

रायगड, पुणे, बीड, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा घाटमाथा, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकाटाडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा इशारा दिला. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पुणे शहरावरील पाणी कपात तूर्तास टळली आहे. पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा होता पालिकेचा विचार. मात्र,गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

अकोला जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून भर पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाची आकडेवारी सामान्य श्रेणीत दिसत असली तरी अनेक भागांत पावसाचे असमान वितरण झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश