AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..
Heat
| Updated on: Apr 14, 2026 | 7:17 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. मागच्या काही दिवसात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान मोठी गारपिटही झाली. या गारपिटी आणि पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा अंदाज वर्तवला आहे. दुपारच्यावेळी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. राज्यात पावसाच्या सावटानंतर आता उष्णता अधिक वाढताना दिसत आहे. पुढील 5 दिवस राज्यात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. अकोला येथे उच्चांकी 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिला. विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागात पारा 40 च्या पार गेला. मालेगाव, सांगली, अमरावती, धुळे, जेऊर, जळगाव, सांगली, सोलापूर, नागपूर, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे होता.

नागरिकांनी दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. यादरम्यान उष्णाचा चटका अधिक तीव्र असेल. राज्यात पुढील काही दिवस सूर्य आग ओकताना दिसेल. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे तापमाना वाढले असून एप्रिल चे दुसऱ्या आठवड्यात ही तापमान चाळीशी पार गेले आहे . जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्यापंधरवड्यात उष्णतेची तीव्र लाट उसळण्याची शक्यता आहे.

18 ते 23 एप्रिल या कालावधीत तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम जाणवू लागला असून गजबजलेल्या रस्त्यांवरही ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.