AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुहेरी संकट, घराबाहेर निघणे टाळाच, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील तास धोक्याचे..

राज्यातील उष्णता वाढत आहे. यादरम्यानच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास अत्यंत धोक्याची असणार आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

दुहेरी संकट, घराबाहेर निघणे टाळाच, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील तास धोक्याचे..
Heat wave
| Updated on: Apr 16, 2026 | 9:28 AM
Share

राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच कधी पाऊस तर उष्णता अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. शक्यतो उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. मुंबईसोबतच राज्यात पुढील चार दिवस ऊष्णतेची लाट असणार आहे. 18 आणि 19 तारखेला पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली. उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले. यासोबतच शक्यतो फार महत्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळणे अधिक फायदेशीर ठरेल.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या उन्हात बाहेर पडले तर उष्णघाताची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने आवाहन केले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि थेट उन्हात जास्त वेळ न थांबणे, या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णता वाढल्याने वर्धा जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील काही तासात तापमानात मोठी वाढ होऊ शकते. अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला.

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.