AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापुरानंतर 2 महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कष्टकऱ्यांचं हजारोंचं नुकसान कसं दिसणार?

महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आज मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

महापुरानंतर 2 महिन्यांनी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कष्टकऱ्यांचं हजारोंचं नुकसान कसं दिसणार?
केंद्रीय पथक आज पाहणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 05, 2021 | 10:05 AM
Share

कोल्हापूर : महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आज मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आता दोन महिन्यानंतर केंद्रीय पथकाला महापुराने झालेलं नुकसान कसं दिसणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी पूर येऊन गेलाय. आता केंद्रीय पथक पुराच्या पाहणीसाठी आणि त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की, दोन महिन्यांपूर्वी झालेलं नुकसान केंद्रीय पथकाला आता कसं दिसणार आहे आणि आज पाहणीनंतर हे पथक सरकारला कोणता अहवाल दाखवणार आहे?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जातायत.

केंद्रीय पथक पाहणीसाठी येतंय. पण पाहणी केल्यानंतर इथे काहीच नुकसान झालं नाही, असा निष्कर्ष केंद्रीय पथक काढणार, मात्र वास्तविक पाहता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे पथकाने लक्षात घ्यायला हवं. महापुराच्या दोन महिन्यानंतर आपण पाहणी करताय म्हणजे पाहणीसाठी दिरंगाई झालीय.  आता कोणत्याही जाचक नियम अटींविना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

दोन महिन्यांनंतरही मदत नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय?

शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर द्या, उगीच त्यांची थट्टा कशाला करताय?, असा सवाल करत जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पथकाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत त्यावेळी झालेलं नुकसान आता पथकाला कसं दिसणार, किंबहुना त्यांना शेतकऱ्यांच्या भावना कशा कळणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

(Inspection tour of Central Squad To kolhapur For inspect the flood damage)

हे ही वाचा :

दोन महिन्यांनंतरही मदत नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय? राजू शेट्टी आक्रमक, शेताच्या बांधावरुन सरकारला इशारा

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती