AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने

महाराष्ट्रात 2006 नंतर आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. राज्यातील पोल्ट्री हब असलेल्या नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आलाय.

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 10, 2021 | 7:54 PM
Share

नंदुरबार : महाराष्ट्रात 2006 नंतर आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. राज्यातील पोल्ट्री हब असलेल्या नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आलाय. बर्ड फ्लूमुळे होणारं नुकसान मोठं आहे. मात्र, शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत कमी असल्याने नवीन व्यवसाय कसा सुरु करावा असा प्रश्न पोल्ट्री उद्योजकांना पडलाय (Insufficient economical help to Poultry Farmers after killing Birds in Maharashtra).

2006 च्या बर्ड फ्लूनंतर मोठ्या हिमतीने उभ्या राहिलेला पोल्ट्री व्यवसाय आता आलेल्या बर्ड फ्लूमुळे संकटात आलाय. कोंबडीचे एक पिल्लू 25 रुपयांना मिळते. त्याला अंडे देईपर्यंत मोठं करण्यास 400 रुपये खर्च होतो. त्याच सोबत खाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यातच बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांसोबत खाद्य आणि अंडे नष्ट केले जात आहे. यानंतर सरकारकडून मिळणारी मदतही कमी आहे, अशी तक्रार या पोल्ट्री चालकांनी केलीय. तसेच अशा परिस्थितीत नवीन व्यवसाय कसा उभा करावा असा प्रश्न उपस्थित केलाय.

बर्ड फ्लूमुळे कोंबड्या आणि अंडी नष्ट केले जात आहे. त्याचप्रमाणे खाद्यही नष्ट केलं जातंय. पोल्ट्री व्यावसायिकांच्या गोडाऊनमध्ये हजारो टन खाद्य आहे. ते नष्ट न करता त्याला 3 महिने सील करावं, अशी मागणी व्यवसायिकांनी केलीय. त्यामुळे होणारं मोठं नुकसान वाचेल अशी आशा या पोल्ट्री व्यावसायिकांना आहे. बर्ड फ्लूमुळे होणाऱ्या पक्षांच्या हत्येनंतर सरकार नुकसान भरपाई देत आहे. पण ती नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असल्याची तक्रार होतेय.

कोंबड्या, अंडी आणि खाद्याची भरपाई म्हणून प्रति पक्षी 90 रुपये, खाद्य 12 रुपये प्रतिकिलो, अंडे 3 रुपये या दराने नुकसान भरपाई होते. ही भरपाई 2009 च्या शासन निर्णयानुसार देण्यात येतेय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. त्यामुळे राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी मदत करताना हात आखडता घेतला तर पोल्ट्री व्यवसाय पुन्हा उभा राहणार नाही, असंही मत व्यक्त केलं जातंय. तसेच सरकारने मदतीचे निकर्ष बदलावेत, अशी मागणी होतेय.

हेही वाचा :

Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर…

नंदूरबारमध्ये ‘ऑपरेशन किलिंग’; दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारल्या

व्हिडीओ पाहा :

Insufficient economical help to Poultry Farmers after killing Birds in Maharashtra

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...