AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर
| Updated on: Nov 17, 2020 | 4:01 PM
Share

नाशिक: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. शिवाय गुजरातला वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावाही जयंत पाटील घेणार आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पावसाचे हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्याचाच आढावा जयंत पाटील आजच्या नाशिक दौऱ्यात घेत आहेत. त्यांनी आज त्रिभूवन या आदिवासी बहुल भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी आमदार नितीन पवार, जे. पी. गावित यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित त्रिभूवन धरणासाठीची जागा संपादित करण्यात आली आहे, असं सांगतानाच स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न आधी सोडवणार, त्यानंतरच इतरत्र पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात हळूहळू सर्व उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याची तिजोरीही लवकरच भरेल, असं सांगतानाच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या

दरम्यान, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पाटील यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. येथील शेतामध्ये नागलीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो पण तरीही शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही. या भागात नॅचरल फिल्टर असलेलं पाणी आहे. त्यामुळे पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या, अशी मागणी झिरवळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

(Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.