AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन बघा काय म्हणाले

अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना सध्या प्रचंड उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणात सध्या कोणतीही घडामोड घडली की त्याचा थेट संबंध लावत अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सुरु होते. या चर्चांवर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? गिरीश महाजन बघा काय म्हणाले
| Updated on: Jul 22, 2023 | 9:54 PM
Share

जळगाव | 22 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे नेमक्या काय घडामोड घडत आहेत? ते फार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. शिंदे यावेळी कुटुंबासह दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिंदे काल रात्री दिल्लीच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचं ट्विट चर्चेला कारण ठरलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिटकरी यांनी शुभेच्छा देणारं ट्विट केलं होतं. यावेळी त्यांनी अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अजित पर्व सुरु होणार, असं आशयाचं ट्विट केलं होतं.

अमोल मिटकरी यांचा हेतू शुद्ध आहे. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून व्यक्त केली. पण राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं. या सगळ्या घडामोडींवर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला काही तथ्य नाही. थोडेफार अतिउत्साही कार्यकर्ते असतात. 2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत. पक्षश्रेष्ठींने थेट सांगितलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याचा विषय नाही. स्वतः उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे की, 2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

दरम्यान, गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. “खरंतर एकनाथ खडसेंना आता दिवसा स्वप्न पडायला लागलं आहे. त्याला काही इलाज नाही. खडसेंनी पक्ष बदलला. त्यामुळे त्यांची बाजू बदलते. एकनाथ खडसे सध्या अस्वस्थ आहेत. त्याला इलाज नाही”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

गिरीश महाजन यांची नाना पटोले यांच्यावरही टीका

गिरीश महाजन यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पटोलेंवरही टीका केली. “नाना पाटोलेंचं काय ऐकावं? त्यांचं स्वत:च्या पक्षात तरी काय स्थान आहे? ते आता वेडंवाकडं बोलणारच आहेत. कारण ते विरोधी पक्षात आहेत. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आम्ही ज्याच्याशी दोस्ती करतो त्याची पूर्ण निभवतो. अजित पवार हे आता आमच्यात आले. त्यामुळे ही दोस्ती आता तुटणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.