AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांची काँग्रेसवर सडकून टीका, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत म्हणाले…

"काँग्रेसने 1947 पासून जी काही धोरण स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स यासारख्या क्षेत्रात पैसा गुंतवला. जी काही इन्वेस्टमेंट झाली ती सर्व त्याचवेळी वाया गेली", अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नितीन गडकरी यांची काँग्रेसवर सडकून टीका, पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत म्हणाले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 12, 2024 | 8:52 PM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जालन्यात आज प्रचारसभा पार पडली. या सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचादेखील उल्लेख केला. “ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. काँग्रेसने 1947 पासून जी काही धोरण स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स यासारख्या क्षेत्रात पैसा गुंतवला. जी काही इन्वेस्टमेंट झाली ती सर्व त्याचवेळी वाया गेली. पण माझं म्हणणं असं आहे की, त्याचवेळी रस्ते बनवण्यासाठी पैसा खर्च झाला असता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी खर्च झाला असता, शाळा बांधण्यासाठी झाला असता, दवाखाने बांधण्यासाठी झाला असता तर कदाचित या देशाचे चित्र आज दुसरं राहिला असतं”, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

“काँग्रेस पक्षाने गरीबी हटावचा नारा दिला. पण कोणाची गरीबी हटली? शेतकऱ्यांची गरिबी हटली नाही. कामगारांची गरीब हटली नाही. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षातील नेत्यांची गरिबी हटली, असा हल्लाबोल नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेस बदलत गेली. पण काँग्रेस देशाचा विकास करू शकली नाही. मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात आम्ही जे काम केले होते ते काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही”, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली.

‘जो करेगा जात की बात उसको खसके मारेंगे लात’

“मी सिंचन खात्याचा मंत्री असताना मी प्राधान्याने सांगू शकतो की,12 हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. विकासासाठी दिले. आपला शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे आणि इंधनदाता झाला पाहिजे. माणूस कधी जात, धर्म, पंथाने मोठा होत नाही. माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो. जो करेगी जात की बात उसको खसके मारेंगे लात”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“योग्य नेता आणि नीती आली की तुमचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, तुमची गरीबी हटल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणुकीमध्ये खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. कोणत्याही पक्षाचा सरकार आला आणि कोणीही पंतप्रधान झाला तर मूलभूत तत्व बदलता येत नाही”, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

गडकरींची आणीबाणीवर टीका

“1975 मध्ये आणीबाणी आली आणि आणीबाणी यायच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी आणीबाणी आणली. आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचे संविधान पूर्ण तोडून मोडून दुरुस्त केलं. ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. ज्यावेळी आणीबाणी लावली त्यावेळी आणि त्याच्या आधी घटनेचा धाज्जीया उडवण्याचं काम तुम्ही केलं. त्यावर आधी राहुल गांधी यांनी उत्तर द्यावं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“आम्ही संविधान बदलणार नाही. मात्र कोणाला बदलवू सुद्धा देणार नाही. मुसलमानांना सांगितलं की, हे भाजपवाले खूप खतरनाक आहेत. हे निवडून आले तर पाकिस्तानमध्ये पाठवून देईल. पण काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं? चहाची टपरी, पानपट्टी याच्याशिवाय काही दिलेच नाही. राजकारणामध्ये जात, धर्म कोणता आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात भांडण लावण्याचे काम आम्ही केलं नाही. येणाऱ्या काळात देखील या देशाकरिता समृद्ध आणि संपन्न बनवायचा आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“पुढील पाच वर्षांमध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनवायची आहे. स्मार्ट सिटी नाहीतर स्मार्ट व्हिलेज सुद्धा आपल्याला बनवायचे आहे. आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे इंजिन मागून लागलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीने जास्त वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही”, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.

Follow Us
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका