AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा; पंकजा मुंडे यांचं थेट सरकारलाच आव्हान

"मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे", अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा; पंकजा मुंडे यांचं थेट सरकारलाच आव्हान
भाजप नेत्या पंकजा मुंडे
| Updated on: Jun 17, 2024 | 8:33 PM
Share

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करावी. पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी या नेत्यांची आहे. या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या दोन्ही नेत्यांच्या उपोषणस्थळी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखल झाल्या. त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील तिथे उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला थेट आव्हानच दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा, असं आव्हान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

“मी दोन दिवस झाले. मी अतिशय विचित्र आणि दु:खी भावनांना सामोरे गेली आहे. मला भेटल्या-भेटल्या आमचे लक्ष्मण भाऊ रडायला लागले. मी त्यांना विचारलं की, लक्ष्मण भाऊ का रडत आहात? तर त्यांनी सांगितलं, ताई तुमचा पराभव झाल्यामुळे चार लोकांनी स्वत:चा जीव संपवला. हे ऐकून मला खूप रडू येतंय. मी परिस्थिती हाताळत असल्यामुळे विचार केला की, याला कुठलंही राजकीय वळण यायला नको. मी फक्त लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जावून त्यांचं म्हणणं काय आहे ते सरकारपर्यंत मांडणार असा त्यांना शब्द देते”, असं आश्वासन पंकजा यांनी उपोषणकर्त्यांना दिलं.

पंकजा मुंडे यांची सरकारकडे मागणी काय?

“माझी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे. आंदोलन देशात कुणीही करु शकतो. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तृव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

“डोंगर, कपाऱ्यात जावून जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे. या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजवून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं.ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याच प्रमाणे यांचं उपोषण सोडवलं जावं”, अशीदेखील मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

Follow Us
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....