डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

माफियांकडून रात्रीच्या वेळी हे उत्खनन होते. गावातील काही जणांचाही यात अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यानंतर हे दगड औरंगाबादमार्गे इतर राज्यांसह चीनपर्यंतही विकले जातात. तसेच काही व्यापारीही जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

जालनाः दोन दिवसांपूर्वीच जालना पोलीस आणि महसूल पथकानं केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची गारगोटी (Pebbles Smuggling) जप्त केली. त्यामुळे जालन्यातल्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गारगोटीची तस्करी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. येथील काहही भागांमध्ये किंवा डोंगराच्या कुशीत तीस-चाळीस फूट खोदलं की आकर्षक गारगोटी लागतात. दगडाच्या दर्जानुसार, या गारगोटींची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या दगडांची चोरी या परिसरात मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याची विक्री परराज्यात तसेच थेट चीनपर्यंतही होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाली आहे.

लाखोंचा भाव, कशासाठी वापर?

जालना परिसरातील काही भागांमध्ये विशेषतः डोंगरी भागात तीस ते चाळीस फूट खोदल्यावर असा दगड सापडतो. हिरवट, काळपट रंगाचा हा दगड अत्यंत मोलाचा आहे. दगडातील मिळणाऱ्या गारगोटीतून घराच्या भिंती, किंवा सजावटीसाठी खूप मागणी असते. महसूल विभागाकडून या दगडाच्या उत्खननाची परवानगी नाही. परंतु काही जण पोलीस, महसूल विभागाची नजर चुकवून याचे उत्खनन करीत असतात. दगडाच्या दर्जानुसार त्याला 40 हजारांपासून 1 लाख रुपये टनांपर्यंतचा भाव मिळतो. शेतातली पिकं निघाली की जिल्ह्यातील विविध भागांतील डोंगरांतून गारगोटीचे उत्खनन सुरु होते. गारगोटीची तस्करी करून तिची विक्री औरंगाबादमार्गे पार चीनपर्यंत केली जाते, असे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

याआधीही माफियांवर कारवाई

जालना ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआदीही 2013 मध्ये अंबड तालुक्यातील काही गावांच्या शिवारातून पोलीस आणि महसूलच्या पथकाने तब्बल 3 कोटी रुपयांची गारगोटी जप्त केली होती. यानंतर 2018 मध्येही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळशेंद्रा परिसरातून तब्बल 40 लाख रुपयांचा दगड जप्त केला होता. या मोठ्या कारवायांव्यतिरिक्त मुख्य तस्करी करणाऱ्यांपर्यंत पोलीस अजूनही पोहोचलेले नाहीत.

कसा होतो व्यवहार?

जिल्ह्यातील माळशेंद्रा, वाघ्रुळ, मान देऊळगाव दगडवाडी यासह अंबड तालुक्यातील नांदी आदी परिसरात या कारवाया झाल्या आहेत. डोंगराच्या उत्खननासाठी जेसीबी ते तस्करी करण्यासाठी इतर वाहनांचा उपयोग होतो. माफियांकडून रात्रीच्या वेळी हे उत्खनन होते. गावातील काही जणांचाही यात अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यानंतर हे दगड औरंगाबादमार्गे इतर राज्यांसह चीनपर्यंतही विकले जातात. तसेच काही व्यापारीही जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

इतर बातम्या-

Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राला मिळणार विषेश सेवा मेडल, 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.