AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KALICHARAN MAHARAJ: ‘सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटली पाहिजे…’, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

KALICHARAN MAHARAJ: हिंदूंसाठी सनातन धर्माची स्थापना झाली पाहिजे. ज्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत त्या हिंदू मालकांना मिळाल्या पाहिजेत. ज्याचे मालक अस्तित्वात नाही त्यांच्या जमिनी सनातन धर्माकडे दिल्या गेल्या पाहिजेत.

KALICHARAN MAHARAJ: 'सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटली पाहिजे...', कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य
Kalichagan Maharaj
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 08, 2025 | 3:28 PM
Share

KALICHARAN MAHARAJ: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या, ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. त्यांचा जे लोक अपमान करतील त्यांची सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटली पाहिजे. काली मातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो. खास करुन ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करुन स्वतःच्या मुंडक्या उतरवा आणि जीव द्या स्वतःचा, यातच हिंदूंच कल्याण आहे, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले.

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची…

बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदूवादी आहेत. त्यांचा वारस तोच असावा, जो कट्टर हिंदूवादी आहे. एकनाथ शिंदे साहेब कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, तेच बाळासाहेबांचे वारस आहेत, असे मला वाटते. कोणताही पक्ष विचारांवर चालत असतो. शिवसेनेचा विचार कट्टर हिंदुत्व आहे. हिंदू राष्ट्र आहे. शिंदे साहेब त्याचे प्रतिनिधी आहेत, हे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.

वक्त बोर्डासंदर्भात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, हिंदूंसाठी सनातन धर्माची स्थापना झाली पाहिजे. ज्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत त्या हिंदू मालकांना मिळाल्या पाहिजेत. ज्याचे मालक अस्तित्वात नाही त्यांच्या जमिनी सनातन धर्माकडे दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांचा उपयोग हिंदूंच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.

तंत्र-मंत्र असतो…

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासंदर्भात वक्तव्य केले. त्याठिकाणी काळी जादू असल्याचे ते म्हणाले होते. त्या वक्तव्यावर बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, प्रत्येकाला आपआपली वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर फडणवीस साहेबांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तंत्र मंत्र असतात जादूटोणा असतात यात काही संशय नाही, असा जर कोणी करत असेल तर त्या त्यांच्या खाजगी गोष्टी आहेत.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!