AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार, शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?

कल्याण आरटीओ क्षेत्रात २३ जून २०२५ पासून शेअर रिक्षाचे भाडे ३ ते ५ रुपयांनी वाढले आहे. तीन महिन्यापूर्वी जाहीर झालेली ही वाढ रिक्षांच्या मीटरच्या पुनर्मानांकनामुळे उशीरा लागू झाली. इंधन किमती आणि देखभाली खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटना म्हणतात.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार, शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?
rickshaw
| Updated on: Jun 23, 2025 | 4:46 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. कारण आता कल्याण आरटीओ क्षेत्रातील प्रवाशांना आता रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. आजपासून (सोमवार, 23 जून 2025) ही नवी भाडेवाढ केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ही भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती. मात्र, रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण न झाल्यामुळे ती आतापर्यंत लागू झाली नव्हती. आता आरटीओ क्षेत्रातील सुमारे 95% रिक्षांचे मीटर पुनर्मानांकित (recalibrated) झाल्याने, रिक्षा चालकांनी आजपासून नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे.

किती असणार भाडेवाढ?

यानुसार, शेअर रिक्षाच्या भाड्यात अंतरानुसार 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे, तर मीटरमध्येही प्रति प्रवासामागे 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

दरवाढीमागील कारण काय?

आधीच दैनंदिन गरजा आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता रिक्षा प्रवासाच्या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी ताण पडणार आहे. दुसरीकडे, रिक्षा संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती आणि देखभालीचा खर्च लक्षात घेता, ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी ती स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.

आर्थिक बोजा वाढला

मात्र, दररोज कामावर जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना आता या वाढीव आर्थिक बोज्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.