सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी, तो प्रश्न विचारताच गप्प, लगेच निघाला, अडचणी वाढणार?
Ketan Agarwal Case : डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्याचे निधन झाल्याचा बनाव त्याची होणारी बायको सिया गोयलने केला होता. मात्र चौकशीनंतर सिया आणि चेतन चौधरीने हा कट रचल्याचे समोर आले होते. आता सियाच्या भावाची कसून चौकशी करण्यात आली आहे.

पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाल्याही माहिती समोर आली होती. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्याचे निधन झाल्याचा बनाव त्याची होणारी बायको सिया गोयलने केला होता. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनचा घात केल्याचे समोर आले आहे. अशातच आज या प्रकरणी सियाचा भाऊ साहील याची 10 तास कसून चौकशी करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आज दुपारी सियाचा भाऊ साहिल गोयलच्या चौकशीला सुरुवात झाली होती, मात्र आता ही चौकशी 10 तासानंतर संपली आहे. या चौकशीत साहिलला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. अशातच चौकशी संपल्यानंतर साहिलला सिया असं करणार होती माहिती होती का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर साहिल गोयलने उत्तर दिले नाही, तो गप्प बसला आणि आपले वाहन जोरात घेऊन निघून गेला. त्यामुळे आता सियाच्या कृत्याची साहिलला कल्पना तर नव्हती ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सिया सासरच्या लोकांवर खूश होती…
आज सिया गोयलच्या वडिलांनी सियाविषयी बोलताना सांगितले की, ‘ही दुख:द घटना आहे. आमचा विश्वास बसत नाही. आम्ही केतनला आमचा मुलगा मानायचो. त्यांना आम्ही गमावलंय याचं दुख आहे. आम्हाला लग्नाच्या खूप अपेक्षा होत्या. काय काय स्वप्न सजवले होते. सियाचा वाढदिवस होता. आम्हाला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेशन करायचं होतं. उदयपूरला लग्न करायचं होतं. बरीच स्वप्न होते. सियाही लग्नाबाबत भरभरून बोलायची. सासरच्या लोकांवर खूश होती. चांगला नवरा आणि घर मिळाल्याचं सांगत होती.’
आम्हाला अफेअरबद्दल माहिती असती तर…
सियाच्या वडिलांनी असेही म्हटले होते की, ‘सियाचं अफेयर असतं तर तिने सांगितलं असतं. तिने थोडं जरी सांगितलं असतं किंवा केतनच्या कुटुंबीयांनी सांगितलं असतं तर आम्ही तिच्याशी बोललो असतो. काही जरी कळलं असतं तर आम्ही बोललो असतो.सिया सिंपल होती. तिचं काही अफेयर होतं असं काही माहीत नव्हतं. जरा जरी माहीत असतं तर सियाला आम्ही दरडावलं असत. चेतन कुठून आला माहीत नाही. त्याला कधी भेटलो नाही. त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो कधी घरी आला नाही, आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही.’
