AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, ‘त्या’ असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. दरम्यान फक्त सियाच नाही तर, तब्बल 115 महिलांनी त्यांच्या जोडीदाराची हत्या केलीये ... पण महिला असं करतात तरी का? यावर सायकोलॉजिस्टने सांगितलं महिलांच्या डोक्यात काय सुरु असतं..

Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, 'त्या' असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..
| Updated on: Jun 27, 2026 | 11:39 AM
Share

Ketan Agrawal Case : उद्योजक केतन अग्रवाल याच्या मृत्यूनंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतन याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आमच्या मुलीची काही चूक असेल तर, तिला देखील केतन जसं मारण्यात आलं, तसंच तिला देखील मारा… असं सियाच्या आई – वडिलांनी सांगितलं आहे. सुरुवातीला हे प्रकरण अपघात समजलं जात होतं. पण चौकशी सुरु करण्यात आली, तेव्हा कळलं की, हा अपघात नाही तर हत्या आहे आणि सिया हिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची हत्या… सांगायचं झालं तर, फक्त सिया हिनेच नाही तर, रिपोर्टनुसार 115 महिलांवर हत्येचे आरोप आहे… पण महिला असं का करतात? यामागे देखील मोठं कारण आहे… केतन अग्रवाल प्रकरणानंतर सायकोलॉजिस्टने महिलांच्या डोक्यात काय सुरु असतं. यावर मोठी माहिती दिली आहे.

सायकोलॉजिस्ट डॉ. बिंदा सिंग यांच्या मते, अशा प्रकरणांकडे फक्त एक अपराध किंवा गुन्हा म्हणून पाहणं योग्य नाही. अशा प्रकरणांच्या मागे काही अंतर्निहित मानसिक आणि सामाजिक घटक असू शकतात. जर एखाद्या मुलीला कुटुंबात स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसेल किंवा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जात असेल. मुलगी कोणासोबत भावनात्मकरित्या जोडली गेली असेल… तिला दीर्घकाळ कोंडल्यासारखं किंवा तणावाचा अनुभव येत असेल तर, असं घडू शकतं.

डॉ. बिंदा सिंग सांगतात की, प्रेमाचं रुपांतर हळू हळू ऑब्सेशनमध्ये होतं. अशात एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की, आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लकच नाही… ती व्यक्ती चांगलं आणि वाईट यामधील अंतर न समजता, घाईत निर्णय घेते. एवढंच नाही तर, सोशल मीडिया आणि आभासी दुनियेमध्ये अडकणारे लोक, वास्तवाचा स्वीकार करु शकत नाही… व्यक्ती स्वतःने तयार केलेल्या त्याच्या आयुष्यात इतका रमतो की, वास्तव आणि कल्पना यामधील अंतर त्याला कळतच नाही.

ऑस्ट्रेलिया येथील रिसर्च काय सांगतं?

अशा प्रकरणांनी जवळून समजण्यासाठी Australian Institute of Criminology (AIC) ने 2020 मध्ये महिलांद्वारे झालेल्या त्यांच्या जोडीदाराच्या हत्येवर (Intimate Partner Homicide) संशोधन करण्यात आलेलं. हे संशोधन 2004 ते 2014 या काळात ऑस्ट्रेलियात नोंदवलेल्या, 115 महिला प्रतिवादींचा समावेश असलेल्या प्रकरणांवर आधारित होते.

संशोधनात असे आढळून आले की, ज्या प्रकरणांमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होती, त्यापैकी सुमारे 48 टक्के हत्या या पूर्वियोजित होत्या; म्हणजेच, त्या अचानक आलेल्या रागाच्या भरात केल्या गेल्या नव्हत्या, तर त्यांची आधीच योजना आखण्यात आली होती. काही घटनांमध्ये पीडित व्यक्तीवर ती झोपेत असताना हल्ला करण्यात आला, तर काही प्रकरणांमध्ये संबंधित महिलेने आपल्या प्रियकराची किंवा अन्य एखाद्या व्यक्तीची मदत घेतली होती.

दरम्यान, संशोधकांना असं आढळून आलं की, अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी दीर्घकाळ कौटुंबिक हिंसाचार तसेच मानसिक किंवा शारीरिक छळ सहन केला होता. काही घटनांमध्ये स्वसंरक्षणाचा पैलूही समोर आला; त्यामुळे, सर्व प्रकरणांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही.

महिला आरोपींचे तीन प्रकारचे प्रकरण

AIC च्या रिपोर्टनुसार, महिला आरोपींचा समावेश असलेली प्रकरणं प्रामुख्याने तीन गटांत विभागली गेली

– ज्या महिलांनी दीर्घकाळापर्यंत कौटुंबिक हिंसाचार किंवा छळ सहन केला होता.

-लज्या महिलांनी नातेसंबंधातील वाद, मत्सर किंवा नातं तुटणं यांसारख्या परिस्थितींत गुन्हा केलेला.

– ज्या महिलांनी आर्थिक कारण, नवीन प्रेमसंबंध किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे आधीच ठरवून जोडीदाराची हत्या केली.

प्रत्येक प्रकरण वेगळं असतं,

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, घडलेल्या घटनांनंतर सर्व महिला आणि पुरुषांनी अरेंज मॅरिजबद्दल स्वतःच मत तयार करणं योग्य नाही. प्रत्येक गुन्ह्यामागे विशिष्ट परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, मानसिक स्थिती आणि वैयक्तिक निर्णय यांचा समावेश असतो. त्यामुळे, अशा प्रकरणांचं आकलन करण्यासाठी मानसशास्त्र, गुन्हेशास्त्र आणि कायदा यांचा एकत्रितपणे विचार करणं आवश्यक आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं